शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रखडलेल्या योजना पूर्ण करा, पाणी सांगाेल्याला देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST

सांगोला : शासन दरबारी रखडलेल्या सर्व सिंचन योजना पूर्ण करून तालुक्याच्या वाट्याचे मंजूर पाणी मिळवून देऊ, असे आश्वासन ...

सांगोला : शासन दरबारी रखडलेल्या सर्व सिंचन योजना पूर्ण करून तालुक्याच्या वाट्याचे मंजूर पाणी मिळवून देऊ, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांना दिले.

आवंढी येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी जत तालुक्यातील वंचित ६५ गावांना नव्याने सहा टीएमसी पाणी मंजूर केल्याबद्दल आवंढी शेतकरी, ग्रामस्थांनी त्यांचा विशेष सत्कार केला. त्यानंतर, मंत्री जयंत पाटील यांनी जवळा (ता.सांगोला) येथे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी आश्वासन दिले.

यावेळी दीपक साळुंखे म्हणाले, जत तालुक्यातील वंचित गावांचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. ६५ गावांना सहा टीएमसी पाणी मिळाल्यास येथील शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. जतच्या शेजारीच शिवेला असणाऱ्या सांगोला तालुक्यातील पाणीप्रश्नही तितकाच गंभीर आहे. सांगोला तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या ५० वर्षांपासून येथील जनता संघर्ष करीत आहे.

तालुक्याचा पाणीप्रश्न आता मार्गी लागला आहे, असे बोलून मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आता आमच्या दुष्काळी सांगोला तालुक्याकडे लक्ष द्यावे व शासन दरबारी टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, सांगोला शाखा कालवा, उजनी उपसा सिंचन योजना अशा विविध सिंचन योजनांतून तालुक्याच्या वाट्याला मंजुर असणारे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

----------

फोटो ओळी

रखडलेल्या योजना संदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करताना दीपक साळुंखे-पाटील.

.......

२४ सांगोला १