शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

घरकुल पूर्ण करा अन्यथा शासनाचे पैसे परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST

माढा तालुक्यातील ११७ गावांमध्ये गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री, रमाई, शबरी, पारधी अशा विविध आवास ...

माढा तालुक्यातील ११७ गावांमध्ये गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री, रमाई, शबरी, पारधी अशा विविध आवास योजनेंतर्गत ३ हजार २४० घरकुले मंजूर झाली होती. त्यापैकी १ हजार ८५ घरकुले विविध कारणांनी लाभार्थ्यांकडून अनुदान हप्ते घेऊनही अपूर्णच राहिली आहेत. म्हणून येथील माढा पंचायत समितीच्या वतीने विविध गावांतील १०० लाभार्थ्यांच्या विरोधात माढा न्यायालयात लाभार्थ्यांनी आपले घर बांधावे अथवा अनुदान म्हणून घेतलेले शासनाचे पैसे परत करावेत, अशी तक्रार दाखल केली होती. यामुळे भविष्यात होणाऱ्या घरकुल योजनेलाही फटका सहन करावा लागत असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास यावेळी आणून दिले होते.

यावर माढा न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी ए.आर. सय्यद यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता लोकअदालतीतचे आयोजन केले होते. त्यात १०० लाभार्थ्यांपैकी ५३ जण हजर राहिले. आणि त्यांनी कोरोनामुळे प्रदीर्घ काळ झालेले लॉकडाऊन व घरकुल बांधकामासाठी वाळूचा अपुरा पुरवठा यामुळे घरकुले बांधली नाहीत; पण लवकरच ती पूर्ण करीत आहोत, असा जबाब दिला. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी वरील आदेश दिला.

पंचायत समितीच्या वतीने माढ्याचे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, सहायक प्रशासन अधिकारी सयाजी बागल, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रमेश बोराडे, विस्तार अधिकारी दादासाहेब मराठे, भारत रेपाळ, राजेंद्र काशीद हे न्यायालयात उपस्थित होते.

----

१२माढा-कोर्ट

माढा न्यायालयाच्या आवारात आयोजित लोकअदालतीत पंचायत समितीचे अधिकारी व घरकुल लाभार्थ्यांची बाजू ऐकून घेताना मुख्य न्यायदंडाधिकारी ए.आर. सय्यद.