शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वेळेत तक्रारी करुनही विमा कंपनी दखल घेईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST

गतवर्षीच्या खरीप पिकांसाठी विमा उतरलेल्या जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यापैकीच वडाळा येथील ८० शेतकरी विम्यापासून ...

गतवर्षीच्या खरीप पिकांसाठी विमा उतरलेल्या जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यापैकीच वडाळा येथील ८० शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. विमा कंपनीला कळविल्यानंतर आलेले तक्रार नंबर शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना दिले. कृषी अधीक्षक माने यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना तपासणी करण्यास सांगितले. याशिवाय गावातील शेतकऱ्यांच्या तक्रारी गावात जाऊन मार्गी लावण्याच्या सूचना माने यांनी दिल्या.

कृष्णात साठे, मधुकर साठे, मनोज साठे, शंकर मोरे, राहुल साठे, प्रताप ढवण, दत्तात्रय कुलकर्णी, रवींद्र साठे आदींनी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. उत्तर सोलापूर तालुक्यातील ७ हजार ८१० शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा भरला होता. त्यापैकी ४ हजार ७२५ शेतकरी विम्याच्या नुकसानीपासून वंचित राहिले आहेत. हे सर्व शेतकरी आम्हाला कधी नुकसान भरपाई मिळणार?, अशी विचारणा करीत आहेत.

----

कंपनी मात्र नफ्यात

विमा कंपनीने उत्तर तालुक्यातील ३ हजार ८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एक कोटी २४ लाख ७२ हजार रुपये जमा केले आहेत. मात्र, कंपनीला शेतकरी हिस्सा तसेच केंद्र व राज्य शासनाकडून ५ कोटी ६५ लाख ७१ हजार रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मात्र नियमाचे भूत दाखवले जाते.

----

विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन शेतकऱ्यांकडील कागदपत्रे तपासणी करावीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळतील व विम्यापोटी दरवर्षी पैसे भरुनही नुकसान भरपाई का मिळत नाही?, हे ही लक्षात येईल.

- कृष्णात साठे शेतकरी, वडाळा

----