शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

वेळेत तक्रारी करुनही विमा कंपनी दखल घेईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST

गतवर्षीच्या खरीप पिकांसाठी विमा उतरलेल्या जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यापैकीच वडाळा येथील ८० शेतकरी विम्यापासून ...

गतवर्षीच्या खरीप पिकांसाठी विमा उतरलेल्या जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यापैकीच वडाळा येथील ८० शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. विमा कंपनीला कळविल्यानंतर आलेले तक्रार नंबर शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना दिले. कृषी अधीक्षक माने यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना तपासणी करण्यास सांगितले. याशिवाय गावातील शेतकऱ्यांच्या तक्रारी गावात जाऊन मार्गी लावण्याच्या सूचना माने यांनी दिल्या.

कृष्णात साठे, मधुकर साठे, मनोज साठे, शंकर मोरे, राहुल साठे, प्रताप ढवण, दत्तात्रय कुलकर्णी, रवींद्र साठे आदींनी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. उत्तर सोलापूर तालुक्यातील ७ हजार ८१० शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा भरला होता. त्यापैकी ४ हजार ७२५ शेतकरी विम्याच्या नुकसानीपासून वंचित राहिले आहेत. हे सर्व शेतकरी आम्हाला कधी नुकसान भरपाई मिळणार?, अशी विचारणा करीत आहेत.

----

कंपनी मात्र नफ्यात

विमा कंपनीने उत्तर तालुक्यातील ३ हजार ८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एक कोटी २४ लाख ७२ हजार रुपये जमा केले आहेत. मात्र, कंपनीला शेतकरी हिस्सा तसेच केंद्र व राज्य शासनाकडून ५ कोटी ६५ लाख ७१ हजार रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मात्र नियमाचे भूत दाखवले जाते.

----

विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन शेतकऱ्यांकडील कागदपत्रे तपासणी करावीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळतील व विम्यापोटी दरवर्षी पैसे भरुनही नुकसान भरपाई का मिळत नाही?, हे ही लक्षात येईल.

- कृष्णात साठे शेतकरी, वडाळा

----