शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
2
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
3
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
4
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
5
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
6
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
7
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
8
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
9
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
10
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
11
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
12
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
13
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
14
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
15
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
16
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
17
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
18
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
19
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
20
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत तक्रारी करुनही विमा कंपनी दखल घेईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST

गतवर्षीच्या खरीप पिकांसाठी विमा उतरलेल्या जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यापैकीच वडाळा येथील ८० शेतकरी विम्यापासून ...

गतवर्षीच्या खरीप पिकांसाठी विमा उतरलेल्या जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यापैकीच वडाळा येथील ८० शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. विमा कंपनीला कळविल्यानंतर आलेले तक्रार नंबर शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना दिले. कृषी अधीक्षक माने यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना तपासणी करण्यास सांगितले. याशिवाय गावातील शेतकऱ्यांच्या तक्रारी गावात जाऊन मार्गी लावण्याच्या सूचना माने यांनी दिल्या.

कृष्णात साठे, मधुकर साठे, मनोज साठे, शंकर मोरे, राहुल साठे, प्रताप ढवण, दत्तात्रय कुलकर्णी, रवींद्र साठे आदींनी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. उत्तर सोलापूर तालुक्यातील ७ हजार ८१० शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा भरला होता. त्यापैकी ४ हजार ७२५ शेतकरी विम्याच्या नुकसानीपासून वंचित राहिले आहेत. हे सर्व शेतकरी आम्हाला कधी नुकसान भरपाई मिळणार?, अशी विचारणा करीत आहेत.

----

कंपनी मात्र नफ्यात

विमा कंपनीने उत्तर तालुक्यातील ३ हजार ८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एक कोटी २४ लाख ७२ हजार रुपये जमा केले आहेत. मात्र, कंपनीला शेतकरी हिस्सा तसेच केंद्र व राज्य शासनाकडून ५ कोटी ६५ लाख ७१ हजार रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मात्र नियमाचे भूत दाखवले जाते.

----

विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन शेतकऱ्यांकडील कागदपत्रे तपासणी करावीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळतील व विम्यापोटी दरवर्षी पैसे भरुनही नुकसान भरपाई का मिळत नाही?, हे ही लक्षात येईल.

- कृष्णात साठे शेतकरी, वडाळा

----