शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी; राजेंद्र राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर व तालुक्यामध्ये दि. ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०० मि. मी.पेक्षा ...

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर व तालुक्यामध्ये दि. ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०० मि. मी.पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून शेतातील शेती उपकरणे, अवजारे पाण्यात वाहून गेली आहेत. त्याचबरोबर फळबागांची व सोयाबीन, तूर, उडीद, मूग आदी पिकांची तसेच कांदा, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची पडझडही झाली आहे.

बार्शी शहरातील प्रत्येक प्रभागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंचे व संसारोपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान होऊन अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दुकानांमध्ये पावसाचे पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे.

बार्शी शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून, नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई देण्यात यावी, अशी विनंती आमदार राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तहसीलदार सुनील शेरखाने यांना दिल्या आहेत.

----