शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

आतां जावें पंढरीसी। दंडवत विठोबासी।

By admin | Updated: July 8, 2014 00:39 IST

पंढरीत चार लाख भाविक; गोपाळपूरपर्यंत पददर्शन रांग, रांगेत एक लाख वारकरी

 पंढरपूर: ‘आता जावें पंढरीसी।दंडवत विठोबासी।।१।। चंद्रभागेचिया तीरीं।आम्हीं नाचों पंढरपुरीं।।२।। जेथें संतांची दाटणी।त्यांचे घेऊं पायवाणी।।३।। तुका म्हणे आम्ही बळी।जीव दिला पायां तळीं।।४।।’आषाढी सोहळ्यासाठी ऊन, वारा, थंडी, ताप, पाऊस यांची तमा न बाळगता विठ्ठलाला दंडवत घालण्यासाठी पायी चालत आलेल्या वारकऱ्यांना आता आषाढी सोहळ्याचे वेध लागले आहेत. ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्यांमधील वारकरी पंढरी जवळ आल्याच्या आनंदात खेळत बागडत वाखरीच्या मुक्कामी विसावले असून, या पालख्या मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. पंढरीत चार लाख भाविकांची दाटी झाली आहे.संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली भंडीशेगावचा मुक्काम हलवून वाखरीकडे मार्गस्थ होताच उभे आणि गोल रिंगण सोहळा करीत वाखरीच्या मुक्कामी विसावले तर जगद्गुरू संत तुकोबाराय पिराची कुरोलीतून निघून रिंगण करीत तेही वाखरीच्या पालखीतळाच्या मुक्कामी विसावले आहेत. रविवारी रात्री भोजनानंतर दहाच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने टाळ-मृदंगाच्या गजरात विठुनामात रात्रभर तल्लीन झालेले वारकरी मात्र पंढरीत पोहोचल्यानंतर वरूणराजा पावल्याच्या आनंदात मोठ्या उत्साहाने रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते. पंढरीही आली आणि पाऊसही झाला, असा भाव त्यांच्या मनी होता. ‘दया तिचे नाव भूतांचे पालन। आणिक निर्दालन कंटकांचे।।’ कंटकांचे निर्दालन करणाऱ्या विठ्ठलाचे दर्शन आता लवकरच होणार असल्याने वारकरी मात्र वाखरीच्या मुक्काम स्थळावर एका रात्रीसाठी विसावले. तुकोबा, ज्ञानोबा, सोपानकाका, निवृत्तीनाथ या सर्व पालख्या पंढरपूर समीप आल्या आहेत. मुक्ताबाई, एकनाथ, गजानन महाराजांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या आहेत.विठ्ठलाची पददर्शन रांग ज्ञानेश्वर दर्शन मंडप, सेतू, सारडा भवन, नऊ दर्शन पत्राशेड ओलांडून गोपाळपूर पोलीस चौकीपर्यंत पोहोचली असून, यामध्ये सव्वा लाख भाविक आहेत. एका भाविकाला नऊ ते साडेनऊ तासांचा कालावधी दर्शनासाठी लागत असल्याचे ज्ञानेश्वर भीमराव भिसे (रा. पिंपरीखेडा) व महादेव खिस्ते (रा. निवळी, ता. जिंतूर, जि. परभणी) यांनी सांगितले. मुखदर्शन रांगेतही अडीच ते तीन हजार भाविक असून, त्यांनाही अर्धा ते पाऊण तासात दर्शन मिळत असून, आॅनलाइनसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले.