शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

जातो माघारी पंढरीनाथा...!

By admin | Updated: July 11, 2014 01:42 IST

पंढरी ओसरू लागली: रेल्वेला गर्दी, एसटीची सेवा गैरसोयीची

पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाचे साजिरे रुप डोळ्यांत साठवून वारकऱ्यांसह भाविकांनी ‘जाता माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ असा कृतकृत्य झाल्याचा भाव मनी बाळगत गुरुवारी परतीचा मार्ग धरला. आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी बसने आणि रेल्वेने आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्य परिवहन महामंडळाने सुरुवातीपासून नियोजन करून राज्याच्या सहा विभागांतून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सोय करून ठेवली होती. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनानेही भाविकांसाठी जादा गाड्यांची सोय केली होती. यामुळे ३ ते ९ जुलैच्या दुपारी १ वाजेपर्यंत ७९ हजार ९७५ भाविक रेल्वेने परतले असल्याची माहिती रेल्वे पंढरपूर विभागाचे मुख्य वाणिज्य अधिकारी एम. के. गोसावी यांनी दिली.राज्य परिवहन महामंडळाची शहरातील दोन्ही बसस्थानके बंद ठेवण्यात आली होती. त्याऐवजी शहराबाहेर तात्पुरती बसस्थानके तयार करण्यात आली होती. यात्रा कालावधीसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या बसस्थानकांकडे रिक्षा व इतर वाहनांनी जाण्यासाठी जादा पैसे खर्च करावे लागत होते.आषाढी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात येणाऱ्या पालख्यांबरोबर गर्दी कमी आहे, असा अनेक जणांचा अंदाज असला तरी महाराष्ट्र परिवहन महामंडळावर याचा काही परिणाम झाला नाही. यावेळी बसच्या वाढीव खेपा देण्यात आल्या आहेत.त्याचबरोबर रिंगण सोहळ्याच्या ठिकाणीही बस ये-जा करीत होत्या. गेल्यावर्षी आषाढी एकादशीच्या रात्री १२ वाजेपर्यंत ६२४२ फेऱ्या तर यंदा ७२८४ फेऱ्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी द्वादशीपर्यंत ३५ हजार ४०० प्रवासी तर यावर्षी ३६ हजार ४७० प्रवासी वाहतूक झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रताप सावंत यांनी दिली आहे.--------------------------रेल्वे प्रशासनानेही भाविकांसाठी जादा गाड्यांची सोय केली होती. यामुळे ३ जुलै ते बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत ७९ हजार ९७५ भाविक रेल्वेने परतले आहेत.- एम. के. गोसावी,मुख्य वा. अ., म. रेल्वे, पंढरपूर