शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गरिबांच्या साहित्य वाटपाला आचारसंहिता

By admin | Updated: June 9, 2014 00:55 IST

जिल्हा परिषद : नियम अभ्यासून विचारणारा नसल्याने प्रशासनाचे राज्य

सोलापूर: कर्मचाऱ्यांच्या बदल्या व ठेकेदारांची कामासाठी अडचण नाही. नियोजन मंडळाच्या बैठकीत पालखी मार्गाच्या नावाखाली पाहिजे ती कामे मंजूर केली जात असताना जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वसामान्यांची मुस्कटदाबी सुरू ठेवली आहे. गावात बसविले जाणारे ऊर्जा बचत दिवे, मागासवर्गीय, गरीब कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या साहित्य वाटपावर प्रशासनाने बंदी घातली आहे. पदाधिकाऱ्यांना वेळच नसल्याने प्रशासनाचा वाट्टेल तसा कारभार सुरू आहे.पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचे कारण पुढे करीत जिल्हा परिषद प्रशासनाला वाट्टेल तसा सोयीचा कारभार सध्या जिल्हा परिषदेचा सुरू आहे. कर्मचारी बदल्याची प्रक्रिया सुरू असतानाच पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता सुरू झाली. ग्रामविकास खात्यानेच स्थगिती दिली अन् ती उठवलीही. ठेकेदारांच्या कामालाही आचारसंहितेची अडचण नाही, परंतु सर्वसामान्य जनतेसाठी मात्र जिल्हा परिषद आचारसंहितेचे पालन कडकपणे राबवत आहे. महिला व बालकल्याण खाते, समाजकल्याण खाते व कृषी खात्याकडून वैयक्तिक साहित्य अनुदानावर दिले जाते. कृषी औजारे, ताडपत्री,फवारणी पंप, शिलाई मशिन, भांडी, नांगर, विद्युत मोटार व अन्य औजारे अनुदान तत्त्वावर दिली जातात. हे साहित्य मागासवर्गीय कुटुंबांना दिले जाते. नेमक्या याच वाटपावर जिल्हा परिषद प्रशासनाने बंदी घातली आहे. १० टक्के रक्कम भरणाऱ्यास ग्रामपंचायतींना ऊर्जा बचत दिवे दिले जातात. दिवे बसविण्याची फाईलही अडविण्यात आली आहे.----------------------------------विचारणारेच कोणी राहिले नाही !महानगरपालिका घरांसाठी सोडत काढते. कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात, पदाधिकाऱ्यांना गाड्या मिळतात, परंतु मागासवर्गीय, गरीब कुटुंबाचे वैयक्तिक साहित्य वाटप बंद आहे. श्रीमंतांना आचारसंहिता नाही परंतु गरिबांसाठी मात्र जिल्हा परिषद प्रशासन कडक आचारसंहिता राबवत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर गाड्या मिळाल्या नसल्याने प्रशासनाला एकेरी भाषेत सुनावणारे पदाधिकारी वैयक्तिक साहित्य वाटपासाठी विचारणा करु शकत नाहीत. कारण कोणाला त्यांच्यासाठी वेळच मिळत नाही.-----------------------------दोन हजार सौरदिवे बसवलेएकीकडे जि.प. गरीबांच्या वैयक्तीक लाभाच्या वाटपाला आचारसंहिता दाखवित असताना दुसरीकडे थेट शासनाकडून आलेले दोन हजार सौरदिवे गावागावातील दलित वस्तीमध्ये बसविले जात आहेत. ऐन आचारसंहितेच्या कालावधीत हे सौरदिवे बसविल्याने आचारसंहिता भंग होत नाही का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शासन पातळीवरुनच दलित वस्तीची नावे अंतिम करण्यात आली आहेत. --------------------------------आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासन जनतेची अडवणूक करीत आहे. एखाद्या गरीब कुटुंबातील महिलेला भांडी मिळाली व तीच्या मुलीच्या संसारासाठी उपयोगी आली तर आचारसंहिता भंग होईल का?.-शिवाजी कांबळेसमाजकल्याण सभापती-------------------------अन्य कोणासाठीही आचारसंहितेची अडचण नाही. केवळ वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीच आचारसंहिता का?. सीईओंना याबाबत यापूर्वीही मी बोलले आहे अन् आजही बोलत आहे.-जयमाला गायकवाडसभापती महिला व बालकल्याण