शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

सहकारी संस्थांचा वापर गरिबांसाठी झाला नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची खंत, माळकवठे येथे कृषी अवजारांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 12:52 IST

शेवटच्या माणसाचा उद्धार व्हावा, त्यांच्या घरात समृद्धी नांदावी, यासाठी राज्यात सहकारी चळवळीचा पाया घातला गेला; मात्र ही चळवळ मूठभर लोकांसाठीच वापरली गेली. गरिबांच्या कल्याणासाठी तिचा वापर होण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सहकार चळवळीचा वापर करण्यात आल्याची खंत राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी माळकवठे येथे बोलताना व्यक्त केली. 

ठळक मुद्देमाळकवठे येथील सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. कृषी विभागाच्या वतीने कोरडवाहू शेती अभियानांतर्गत शेतकºयांना २० ट्रॅक्टर, २० कृषी पंप, २० पीव्हीसी पाईप संच, भाजी-पाल्यासाठी ५०० कॅरेटस्चे वितरणयेत्या वर्षभरात राज्यातील पाच हजार विकास सोसायट्या सक्षम करण्याचा प्रयत्न : सहकार मंत्री

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : शेवटच्या माणसाचा उद्धार व्हावा, त्यांच्या घरात समृद्धी नांदावी, यासाठी राज्यात सहकारी चळवळीचा पाया घातला गेला; मात्र ही चळवळ मूठभर लोकांसाठीच वापरली गेली. गरिबांच्या कल्याणासाठी तिचा वापर होण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सहकार चळवळीचा वापर करण्यात आल्याची खंत राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी माळकवठे येथे बोलताना व्यक्त केली. माळकवठे येथील सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. कृषी विभागाच्या वतीने कोरडवाहू शेती अभियानांतर्गत शेतकºयांना २० ट्रॅक्टर, २० कृषी पंप, २० पीव्हीसी पाईप संच, भाजी-पाल्यासाठी ५०० कॅरेटस्चे वितरण सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. माळकवठे विकास सोसायटीच्या वतीने ठेवी स्वीकारण्याचा शुभारंभ तसेच सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शासकीय हमीभावात तूर खरेदी केंद्र सुरू असून १०१ मे.टन पोत्याचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील होत्या. व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, आत्माचे संचालक विजयकुमार बरबडे, उपसभापती संदीप टेळे, भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जि. प. सदस्य आण्णाराव बाराचारे, प्रभावती पाटील, पं. स. सदस्य महादेव कमळे, शशीकांत दुपारगुडे, रेखा नवगिरे, सोनाली कडते यांची उपस्थिती होती.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हणमंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात, कंपनीच्या प्रगतीचा आढावा मांडला. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, येत्या वर्षभरात राज्यातील पाच हजार विकास सोसायट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. अनुदानातून नाही तर शेतकºयांच्या योगदानातून सहकारी संस्थांचा आणि गावांचा विकास होऊ शकतो. तालुक्यात गेल्या ७० वर्षांत अवघे १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ६७ टक्के साक्षरतेचे प्रमाण आहे. वाळू वाहतुकीने रस्त्यांची चाळण झाली तरीही विरोधकांना या तालुक्यासाठी काही करावेसे वाटले नाही. समाजाला अज्ञानात ठेवण्यातच धन्यता मानणाºयांनी स्वार्थी राजकारणापलीकडे पाहिलेच नाही, असा टोला त्यांनी लगावला. या कार्यक्रमास हंजगीचे आरकेरी महाराज, डॉ. चनगोंडा हविनाळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रशांत कडते, टाकळीच्या सरपंच सुशीला ख्यामगोंडे, शिरीष पाटील, भीमाशंकर नरसगोंडे, गुरण्णा तेली, कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील, मायप्पा व्हनमाने, शरीफ शेख, मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, मद्रेच्या सरपंच विजयालक्ष्मी होनमाने, यतीन शहा, तांदुळवाडीचे सरपंच सिद्धाराम हेले, तालुका कृषी अधिकारी श्रीधर गावंडे, सहायक निबंधक बालाजी वाघमारे, प्राचार्य विश्रांत गायकवाड, सचिन पाटील, माळकवठेचे सरपंच शिवलिंग बगले, उपसरपंच शकिला शेख, सोसायटी चेअरमन भाऊसाहेब सगरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकुमार साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. -----------------------------लोकमंगलला पर्याय द्या..- लोकमंगल ही एक चळवळ आहे. वृद्ध, निराधार माता-पित्यांच्या मुखात दोन घास प्रेमाने भरविणारी ही संस्था आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यातून गरजू गरिबांना आधार देणारी आणि युवकांना रोजगार देण्यासाठी सातत्याने धडपडणारी ही संस्था समाजाच्या उद्धारासाठी काम करते. तिला संपविण्याची भाषा करण्याऐवजी या संस्थेला पर्याय देणारी संस्था उभारा, अशा शब्दात सहकार मंत्री देशमुख यांनी आ. प्रणिती शिंदे यांनी निंबर्गीत केलेल्या वक्तव्याला नाव न घेता प्रत्युत्तर दिले. -------------------------लोण्याच्या गोळ्यासाठी एकी- साडेतीन वर्षांत एकमेकांची तोंडे न बघणारी नेतेमंडळी आता एकत्र आली आहेत. विकासकामासाठी नाही, जनतेच्या भल्यासाठी नाही तर बाजार समितीच्या लोण्याचा गोळा घशात घालण्यासाठी ते एकत्र आले आहेत. त्यांनी शेतकºयांसाठी आजपर्यंत काय केले? याचे त्यांनी उत्तर दिले पाहिजे. निवडणुकीत त्यांना जाब विचारा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख