शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सहकारी संस्थांचा वापर गरिबांसाठी झाला नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची खंत, माळकवठे येथे कृषी अवजारांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 12:52 IST

शेवटच्या माणसाचा उद्धार व्हावा, त्यांच्या घरात समृद्धी नांदावी, यासाठी राज्यात सहकारी चळवळीचा पाया घातला गेला; मात्र ही चळवळ मूठभर लोकांसाठीच वापरली गेली. गरिबांच्या कल्याणासाठी तिचा वापर होण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सहकार चळवळीचा वापर करण्यात आल्याची खंत राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी माळकवठे येथे बोलताना व्यक्त केली. 

ठळक मुद्देमाळकवठे येथील सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. कृषी विभागाच्या वतीने कोरडवाहू शेती अभियानांतर्गत शेतकºयांना २० ट्रॅक्टर, २० कृषी पंप, २० पीव्हीसी पाईप संच, भाजी-पाल्यासाठी ५०० कॅरेटस्चे वितरणयेत्या वर्षभरात राज्यातील पाच हजार विकास सोसायट्या सक्षम करण्याचा प्रयत्न : सहकार मंत्री

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : शेवटच्या माणसाचा उद्धार व्हावा, त्यांच्या घरात समृद्धी नांदावी, यासाठी राज्यात सहकारी चळवळीचा पाया घातला गेला; मात्र ही चळवळ मूठभर लोकांसाठीच वापरली गेली. गरिबांच्या कल्याणासाठी तिचा वापर होण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सहकार चळवळीचा वापर करण्यात आल्याची खंत राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी माळकवठे येथे बोलताना व्यक्त केली. माळकवठे येथील सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. कृषी विभागाच्या वतीने कोरडवाहू शेती अभियानांतर्गत शेतकºयांना २० ट्रॅक्टर, २० कृषी पंप, २० पीव्हीसी पाईप संच, भाजी-पाल्यासाठी ५०० कॅरेटस्चे वितरण सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. माळकवठे विकास सोसायटीच्या वतीने ठेवी स्वीकारण्याचा शुभारंभ तसेच सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शासकीय हमीभावात तूर खरेदी केंद्र सुरू असून १०१ मे.टन पोत्याचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील होत्या. व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, आत्माचे संचालक विजयकुमार बरबडे, उपसभापती संदीप टेळे, भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जि. प. सदस्य आण्णाराव बाराचारे, प्रभावती पाटील, पं. स. सदस्य महादेव कमळे, शशीकांत दुपारगुडे, रेखा नवगिरे, सोनाली कडते यांची उपस्थिती होती.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हणमंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात, कंपनीच्या प्रगतीचा आढावा मांडला. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, येत्या वर्षभरात राज्यातील पाच हजार विकास सोसायट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. अनुदानातून नाही तर शेतकºयांच्या योगदानातून सहकारी संस्थांचा आणि गावांचा विकास होऊ शकतो. तालुक्यात गेल्या ७० वर्षांत अवघे १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ६७ टक्के साक्षरतेचे प्रमाण आहे. वाळू वाहतुकीने रस्त्यांची चाळण झाली तरीही विरोधकांना या तालुक्यासाठी काही करावेसे वाटले नाही. समाजाला अज्ञानात ठेवण्यातच धन्यता मानणाºयांनी स्वार्थी राजकारणापलीकडे पाहिलेच नाही, असा टोला त्यांनी लगावला. या कार्यक्रमास हंजगीचे आरकेरी महाराज, डॉ. चनगोंडा हविनाळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रशांत कडते, टाकळीच्या सरपंच सुशीला ख्यामगोंडे, शिरीष पाटील, भीमाशंकर नरसगोंडे, गुरण्णा तेली, कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील, मायप्पा व्हनमाने, शरीफ शेख, मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, मद्रेच्या सरपंच विजयालक्ष्मी होनमाने, यतीन शहा, तांदुळवाडीचे सरपंच सिद्धाराम हेले, तालुका कृषी अधिकारी श्रीधर गावंडे, सहायक निबंधक बालाजी वाघमारे, प्राचार्य विश्रांत गायकवाड, सचिन पाटील, माळकवठेचे सरपंच शिवलिंग बगले, उपसरपंच शकिला शेख, सोसायटी चेअरमन भाऊसाहेब सगरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकुमार साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. -----------------------------लोकमंगलला पर्याय द्या..- लोकमंगल ही एक चळवळ आहे. वृद्ध, निराधार माता-पित्यांच्या मुखात दोन घास प्रेमाने भरविणारी ही संस्था आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यातून गरजू गरिबांना आधार देणारी आणि युवकांना रोजगार देण्यासाठी सातत्याने धडपडणारी ही संस्था समाजाच्या उद्धारासाठी काम करते. तिला संपविण्याची भाषा करण्याऐवजी या संस्थेला पर्याय देणारी संस्था उभारा, अशा शब्दात सहकार मंत्री देशमुख यांनी आ. प्रणिती शिंदे यांनी निंबर्गीत केलेल्या वक्तव्याला नाव न घेता प्रत्युत्तर दिले. -------------------------लोण्याच्या गोळ्यासाठी एकी- साडेतीन वर्षांत एकमेकांची तोंडे न बघणारी नेतेमंडळी आता एकत्र आली आहेत. विकासकामासाठी नाही, जनतेच्या भल्यासाठी नाही तर बाजार समितीच्या लोण्याचा गोळा घशात घालण्यासाठी ते एकत्र आले आहेत. त्यांनी शेतकºयांसाठी आजपर्यंत काय केले? याचे त्यांनी उत्तर दिले पाहिजे. निवडणुकीत त्यांना जाब विचारा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख