शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी उचलण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST

भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून इंदापूर (जि. पुणे) तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिचंन व निरा डावा कालव्यावरील ...

भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून इंदापूर (जि. पुणे) तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिचंन व निरा डावा कालव्यावरील २२ गावांतील शेतीसाठी पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य शासनाची परवानगी दिली आहे. इंदापूर तालुक्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे उजनी धरणावरचा ताण वाढणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियोजनाखाली मंत्री भरणे यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. या प्रस्तावावर २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाली असून, जलसंपदा मंत्रालयाने याबाबत शासन निर्णय पारित केल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

खडकवासला कालव्यावरील शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत ३६ गावांना उन्हाळी आवर्तनात शेतीला पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. याशिवाय निरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. इंदापूर विधानसभेच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत २२ गावांचा पाणी प्रश्न हा कळीचा मुद्दा होता. हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी मंत्री भरणे यांचा पाठपुरावा चालू होता. वारंवार या योजनेवरून भरणे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले होते.

----

खडकवासला कालव्यात टाकणार पाणी

कुंभारगाव परिसरातील उजनी जलाशयातून १० हजार एच.पी. क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. ते पाणी १० कि.मी. अंतरावर शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. तेथून हे पाणी खडकवासला कालव्यातून बेडसिंगेपर्यंतच्या शेती सिंचनासाठीही वापरले जाणार आहे. सणसर जोड कालवातून नीरा डाव्या कालव्यावरील २२ गावातील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे. दोन्ही कालव्यांवरील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. योजनेसाठी सुमारे ६०० कोटी रुपये खर्च येणार आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे.