शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याला न्याय दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST

राज्य शासनाच्या आदेशाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी टीकेची झोड उठविल्याने उजनीच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ...

राज्य शासनाच्या आदेशाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी टीकेची झोड उठविल्याने उजनीच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांमधून जागृतीचे काम सुरू केले होते.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आ. शहाजीबापू पाटील यांच्याही घरासमोर शेतकरी नेते माऊली हळणकर व दीपक भोसले यांनी हलगीनाद आंदोलन करून सर्वांचेच लक्ष वेधले होते. यावेळी आ. शहाजीबापू पाटील यांनी उजनीच्या पाण्यावरून अतिशय आक्रमक भूमिका घेत राज्य शासनाच्या या निर्णयास कडाडून विरोध केला व रक्तरंजित लढाईचा इशाराही दिला होता. थेट माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उडवली होती. ही टीका राज्यभर चर्चेचा विषय झाला.

दुष्काळी सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी वरदायिनी आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्याची मदार उजनीवर अवलंबून आहे. उजनी पाणी वाटप यापूर्वी ठरले असतानाही त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ माजल्याने आपण याविषयी परखडपणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा माजी केंद्रीय मंत्री खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन उजनीबाबत काढलेला आदेश तत्काळ रद्द केला असल्याचे आ. शहाजीबापू पाटील म्हणाले.

-----

११७ टीएमसी क्षमता असणाऱ्या उजनी धरणाच्या निर्मितीपासून एक थेंबही पाणी अद्यापपर्यंत सांगोला तालुक्याला मिळालेले नाही. २१-२२ वर्षाहून अधिक काळ उजनीच्या पाण्यासाठी सांगोल्यातील जनता संघर्ष करीत आहे. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडून त्यांच्या कार्यकाळात सांगोला उपसा सिंचन योजना मार्गी लागेल, अशी अपेक्षा व भावना होती. मात्र येथील जनतेची अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्यामुळे हा उद्रेक असून पाणी मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.

- ॲड. शहाजीबापू पाटील, आमदार, सांगोला विधानसभा मतदारसंघ