शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सुमारे २० टक्के वारी घटण्याची शक्यता

By admin | Updated: July 7, 2014 00:52 IST

आता एक दिवसाच्या आषाढीचीच आशा

 भंडीशेगाव: यंदाच्या आषाढी वारीवर दुष्काळाचे सावट असल्याने ४० टक्के वारकरी कमी आले. असे असले तरी ऐन आषाढीत एक दिवसाच्या वारीसाठी २० टक्के तरी वारकरी थेट पंढरपुरात येत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २० टक्के वारी कमी भरेल, असा अंदाज आहे.पंढरपूरला येणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या दोन मुख्य पालख्यांसमवेत दरवर्षी किमान चार लाख आषाढीची वारी १० लाखांपर्यंत जाते. यंदा मात्र दोन्ही पालख्या मिळून अडीच लाख वारकरी वाटचाल करीत आहेत. पाऊस पडो अथवा न पडो या विचाराने यात आणखी २० टक्के वाढ होईल असे अपेक्षित आहे, असे अनेक दिंडीकऱ्यांचे मत आहे. यामुळे सात ते साडेसात लाखांपर्यंत आषाढीचा सोहळा जाईल अशी अपेक्षा आहे. याबाबत वासकर दिंडीचे राणू महाराज वासकर यांना विचारले असता, गतवर्षी आपल्या दिंडीत १००० वारकरी होते. यंदा ६५० वारकरी आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आषाढी दिवशी यात थोडी वाढ होईल, असे ते म्हणाले. पुण्याच्या मावळ भीमाशंकर परिसरात पाऊस नसल्याने भाताची लावणी झालेली नाही. आता पाऊस पडला तरी रोपे जळाल्याने नव्याने रोपे तयार करावी लागणार आहेत. या परिसरातून आलेल्या आंबेगाव तालुका दिंडीचे प्रमुख डी.आर. शिंदे, सचिव डॉ. बोराडे म्हणाले, भाताची लागण न झाल्याने आमच्या दिंडीत गतवर्षीच्या तुलनेत ६०० ऐवजी ५०० वारकरी आले आहेत.सातारा परिसरातून आलेल्या शांत मारुती वैष्णव मंडळ दिंडीचे प्रमुख विजय शरद लेवे म्हणाले, आमच्या दिंडीतही २५० ऐवजी २०० वारकरी आले आहेत.तिंतरवणी ता. गेवराई (जि. बीड) येथून श्रीराम संस्थानची दिंडी आली आहे. पावसाअभावी आमच्या भागात कापूस, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांचा पेरा झालेला नाही. यामुळे ५०० ऐवजी ३०० वारकरी यंदा आले आहेत.---------------------------एकंदरीत ४० टक्के वारीत घट झाली असली तरी एक दिवसाच्या वारीसाठी २० टक्के वारकरी येतील, अशी आशा आहे. यामुळे यंदा २० टक्के वारी कमी भरेल, असे दिंडीकऱ्यांना वाटते.