शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

केंद्राच्या पथकाने केली कोळेगाव, लांबोटी, पेनूरच्या परिसराची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:19 IST

ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. त्याची पाहणी मंगळवारी केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव यशपाल आणि रस्ते ...

ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. त्याची पाहणी मंगळवारी केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव यशपाल आणि रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामसेवक सचिन वसेकर, कृषी सहायक श्रीकांत इंगळे, कृषी सहायक गावडे यांच्यासह या भागातील शेतकरी धनाजी गावडे, कुंडलिक गावडे, कुंडलिक देशमुख, मनोज देशमुख, नितीन देशमुख, राहुल वाघमोडे, अमोल वाघमोडे, ज्ञानेश्वर देशमुख, सचिन देशमुख, सत्यवान देशमुख, समाधान गावडे, बबन देशमुख, पप्पू देशमुख आदी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर समस्या मांडल्या.

कलेक्टरनी दिली पथकास माहिती

केंद्रीय पथकाने सकाळीच लांबोटी येथील शेतकरी तात्या चंदनशिवे यांच्या उसाची पाहणी केली. कोळेगाव येथे देशमुख वस्तीवरील बंधाऱ्याची, शेतीची, विजेचे खांब, पडझड झालेल्या घरांची पाहणी करून माहिती घेतली. या ठिकाणी अतिपावसाने भोगावती, सीना आणि नागझरा नद्यांचे पाणी रात्री अचानक आले. यामुळे कुंडलिक देशमुख, निखिल देशमुख यांचे राहते घर वाहून गेले. आणखी चार-पाच घरांची पडझड झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पथकास सांगितले.

पेनूरच्या शेतात अजुनही चिखल

पेनूर येथील फुलाबाई माने आणि विजयाताई चव्हाण यांच्या मका पिकाचे नुकसान झाले आहे. येथे अजून शेतात चिखल असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. पिकाचा पंचनामा झाला असून मदत त्वरित मिळेल, अशी माहिती पथकाला देण्यात आली. भारत सलगर यांच्या दीड एकर केळीच्या बागेचे नुकसान झाले आहे. पथकाने प्रत्यक्ष केळीच्या बागेत जाऊन माहिती घेतली.

----

फोटो: मोहोळ तालुक्यातील नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करताना केंद्रीय पथक आणि शेतकरी.

===Photopath===

221220\22sol_3_22122020_4.jpg

===Caption===

फोटो: मोहोळ तालुक्यातील नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करताना केंद्रीय पथक आणि शेतकरी.