शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

सतर्क शेतकऱ्यांना मिळाली विमा कंपनीकडून नुकसानीची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:20 IST

यावर्षी जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरीप पेरणी क्षेत्रातही मोठी वाढ झाली. मात्र जोमात आलेली खरीप पिके ...

यावर्षी जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरीप पेरणी क्षेत्रातही मोठी वाढ झाली. मात्र जोमात आलेली खरीप पिके सतत पाऊस पडत राहिल्याने नुकसानीत सापडली. त्यातच अतिवृष्टी झाल्याने पिके वाहून गेली. चांगला पाऊस पडल्याने यावर्षी दोन लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी एक लाख ८९ हजार ८१५ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविम्याची रक्कम भरली होती. शेतकरी हिस्सा १० कोटी ३५‍ लाख तसेच शासन हिस्स्यासह विमा कंपनीकडे १२० कोटी १५ लाख रुपये जमा झाले होते.

अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले असेल तर शासन व विमा कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावर, मेलद्वारे व लेखी अर्ज देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले होते. त्यावेळी ५५ हजार ८५१ शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ४१ हजार ४२ शेतकऱ्यांना ३४ कोटी ७७ लाख रुपये विमा कंपनीने दिले आहेत. पात्र असलेल्या ६ हजार ४८९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लाख रुपये मंजूर आहेत, मात्र शासन हिस्सा जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पैशाची वाट पहावी लागत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे सजगपणे ( सर्तक) तक्रार नोंदविलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने पैसे दिले मात्र विमा भरूनही अतिवृष्टीनंतर तक्रार नोंदविण्यासाठी गाफील राहिलेल्या सव्वादोन लाख शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर मदत अवलंबून आहे.

-----

२३८४ पीक कापणी प्रयोग

खरीप हंगामातील सर्वच पिकांचे २३८४ पीक कापणी प्रयोग करण्यात येत आहेत. त्यापैकी १९१६ प्रयोगाचे अहवाल शासन व विमा कंपनीकडे गेले आहेत तर ४६८ अहवाल अद्याप गेलेले नाहीत. हे अहवाल गेल्यानंतर व अहवालात नुकसान किती दाखविले यावर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अवलंबून आहे, तूर व भुईमुगाचे पीक कापणी अहवाल पेंडिंग असल्याचे सांगण्यात आले.

---

दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा विमा आमच्या तालुक्यातील शेतकरी भरतात. मात्र विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जाते. यावर्षी सर्वच पिके मातीसह वाहून गेली, मात्र सरकार व विमा कंपनीने अद्याप कसलीही आर्थिक मदत दिली नाही.

- बाळासाहेब पाटील,

माजी पंचायत समिती सदस्य

----