शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

आदेशाचा भंग करून धरणे आंदोलन केल्याबद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:18 IST

टेंभुर्णी : उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याबाबत शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा यासाठी भीमानगर ...

टेंभुर्णी : उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याबाबत शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा यासाठी भीमानगर येथे १७ दिवसांपासून धरणे आंदोलन करणारे जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया देशमुख यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना टेंभुर्णी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. आदेशाचा भंग करून परवानगी नसताना आंदोलन केले म्हणून ही कारवाई करण्यात आली.

जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरभय्या देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांच्यासह दत्तात्रय, विठ्ठल व्यवहारे, विठ्ठल दत्तू मस्के, ज्ञानेश्वर विलास जवळेकर, प्रतापसिंह बिभीषण चंदनकर अशी अटक केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

जनहितसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप आदी कार्यकर्ते १७ दिवसांपासून उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी देण्याचा शासन निर्णय रद्द करावा म्हणून भीमानगर येथील उजनी धरणाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलनास बसले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. तसेच धरणे आंदोलनास परवानगी देण्यात आली नसतानाही आदेशाचा भंग केल्याबद्दल भादंवि कलम १८८, २६९, २७०, १४३ आदी कलमांन्वये या कार्यकर्त्यांना शुक्रवारी सायंकाळी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.

----