शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पुतण्याच्या डोळ्यादेखत वाहनाने नेले ५० फूट फरफटत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:37 IST

पंढरपूर : पहाटेची शुद्ध हवा घेण्यासाठी व व्यायामासाठी निघालेल्या स्वत:च्या काका व काकूला चारचाकी वाहन ५० फूट फरफटत नेत ...

पंढरपूर : पहाटेची शुद्ध हवा घेण्यासाठी व व्यायामासाठी निघालेल्या स्वत:च्या काका व काकूला चारचाकी वाहन ५० फूट फरफटत नेत असल्याचे चित्र पाहण्याची वेळ अजिंक्य नामदेव बारले या पुतण्यावर आली. ही घटना मंगळवारी (दि. १५) पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. यामध्ये जयश्री बारले यांचा मृत्यू झाला आहे.

पंढरपूर येथे प्रकाश बारले यांचा २० वर्षापासून विठ्ठल दर्शन मंडप परिसरात प्रासादिक वस्तू विक्रीचं दुकान आहे. प्रकाश आदिनाथ बारले (वय ५४) व जयश्री प्रकाश बारले (वय ५०, दोघे रा. गोविंदपुरा, पंढरपूर) हे चंद्रभागा नदीच्या पलिकडे ६५ एकर परिसरात व्यायमासह फिरण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. त्यांच्याबरोबर अजिंक्य नामदेव बारले (वय ३३) व स्मिता अजिंक्य बारले (वय ३०) हे दोघेही त्यांच्या दुचाकीवरून जात होते. दोन वाहनांमध्ये १५ ते २० फूट अंतर होते. ते चंद्रभागा नदीवरील नवीन पुलावरील मध्यावर आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बिगरनंबरच्या चारचाकी वाहनाने अजिंक्य बारले यांच्या वाहनाला कट मारून समोरील प्रकाश बारले यांच्या दुचाकीला धडक दिली. अन्‌ क्षणातच जयश्री यांना काळाने ओढून नेले. त्या जागीच गतप्राण झाल्या. पती प्रकाश यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना सोलापूरला उपचारासाठी नेले आहे. त्याच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

तरी त्यांना आली नाही दयाप्रकाश बारले यांच्या वाहनाला धडक देणाऱ्या वाहनामध्ये थोडी वाळू, खोऱ्या व पाट्या आढळून आल्या. धडक दिल्यानंतर प्रकाश व जयश्री हे दोघे गंभीर जखमी झाल्याचे पाहूनही त्या ठिकणच्या लोकांनी धडक देणाऱ्या त्या व्यक्तींना त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत करा, अशी विनंती केली. मात्र चारचाकीतील व्यक्तींना जराही दया आली नाही. त्यांनी तत्काळ तेथून पळ काढला.

अनेकांना झाला असता धोका

चंद्रभागा नदीवरील नवीन पुलावर गोविंदपुरा, आंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी व प्रदक्षिणा मार्ग आदी परिसरातील नागरिक पहाटे फिरण्यासाठी येतात. यामुळे नवीन पुलावर दररोज पहाटेच्या वेळी गर्दी असते. त्याचवेळी त्याठिकाणावरून अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने जातात. प्रकाश बारले यांचा अपघात झाला यावेळीदेखील पुलावर गर्दी होती. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात पडला होता. मात्र सुदैवाने कोणालाही कसलीच इजा झाली नाही.