शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पंढरपूरच्या भक्तनिवासात ‘व्हीआयपीं’चा कब्जा

By admin | Updated: July 3, 2017 10:53 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर : सचिन कांबळेपंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गोरगरीब भाविकांच्या राहण्याची सोय अल्पदरात व्हावी. या हेतूने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या भक्तनिवासांवर ऐन आषाढी यात्रा कालावधीत व्ही.आय.पी.नीं डाका टाकल्याने सर्वसामान्य भाविकांच्या निवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. भक्तनिवासात त्यांना अल्पदरात जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांना खासगी लॉजकडे नाईलाजास्तव मोठ्या रकमा मोजाव्या लागत आहेत.शहरात वर्षाकाठी भरणारे चार यात्रा सोहळे याशिवाय वर्षभर विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कोट्यवधींच्या घरात असते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक सर्वसामान्य गरीब म्हणून परिचित आहेत. त्यांना पंढरपुरातील खासगी लॉज व अन्य निवासासाठी मोठी रक्कम मोजणे शक्य नसल्याने विठ्ठल मंदिर समितीने वेदांत, व्हिडीओकॉन भक्तनिवास ही निवासस्थाने स्वत:च्या खर्चातून व देणगीदारांच्या मदतीने भव्य स्वरुपात उभारलेली आहेत. या निवासस्थानातील खोल्या सर्वसामान्य भाविकांना अल्पदरात दिल्या जातात.मात्र आषाढी यात्रा सोहळ्यामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर समितीच्या तिन्ही भक्त निवासस्थानांमध्ये मागणी करूनही खोल्या उपलब्ध नसल्याचे मार्मिक उत्तर ऐकावयास मिळत आहे. सर्वसामान्य भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानामध्ये व्ही.आय.पी. साठी तब्बल ६४ रुम बुक करण्यात आल्याचे मंदिर समिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.-------------------ते व्ही.आय.पी. कोण ?आषाढी यात्रा सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळांतील त्यांचे कॅबिनेट व राज्यमंत्री दर्जाचे सहकारी, अनेक सहकारी, शासकीय अधिकारी असा लवाजमा असतो. त्यांच्यासाठी बांधकाम विभागाच्या निवासस्थानासह जिल्हा परिषद, वीज वितरण, पाटबंधारे आदीच्या शासकीय निवासस्थानांमध्ये सोय केलेली असते. याशिवाय त्या-त्या पक्षांचे स्थानिक कार्यकर्त्यांचे अलिशान बंगले, फार्महाऊसमध्ये या मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांची बडदास्त असते. असेल तर मंदिर समितीच्या गरिबांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांवर ६४ रुम कोणत्या व्ही.आय.पी. साठी बुक करण्यात आल्या आहेत. हा प्रश्न अधांतरी आहे. त्यामध्ये कोण राहणार हे जाहीर करण्यास मंदिर समितीचे कर्मचारी तयार नसल्याने समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण झाले आहे.