शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचा अंदाज घेत उमेदवारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST

करण्याच्या पहिल्या दोन दिवसात केवळ २० अर्ज दाखल झाले होते. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी ...

करण्याच्या पहिल्या दोन दिवसात केवळ २० अर्ज दाखल झाले होते. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी असतानादेखील पाहिजे त्या प्रमाणात अर्ज दाखल झाले नाहीत दोन दिवस शिल्लक असताना विरोधकांचा अंदाज घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू आहे. सोमवारी ३३ गावांतील १४० उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांनी दिली.

सोमवारी वैराग ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. गावोगावच्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी केली होती. दिवसभर नेटवर्क स्लो असल्यामुळे कित्येकांनी रात्री उशिरापर्यंत थांबून अर्ज भरुन घेतले, मात्र प्रत्यक्षात अर्ज दाखल केले नाहीत. समोरच्या पॅनलकडून कोणाचा अर्ज दाखल होतो याचा अंदाज आल्यानंतरच आपला अर्ज दाखल करायचा, असा पवित्रा गावोगावच्या पॅनलप्रमुखांचा आहे.

या गावातून दाखल अर्ज

चारे येथून सर्वाधिक २० अर्ज दाखल झाले.

इर्लेवाडी ६, आळजापूर, दहिटणे, कव्हे, कासारवाडी, माळेगाव, नागोबाचीवाडी, सावरगाव १, बाभूळगाव, धामणगाव, बोरगाव, जामगाव, उपळाई २, भोईंजे, गाताचीवाडी, पिंपळगाव धस, यावली ३, धानोरे, घोळवेवाडी, सारोळे, शिराळे, शेलगाव व्हळे, तडवळे ६, कळंबवाडी, खांडवी ५, कासारी, वानेवाडी, वालवड ४, पांढरी ७, पिंपरी पा. ९, सासुरे ८, शेळगाव आर. १३

वैरागमधून एकही अर्ज नाही, नेतेमंडळींकडून चौकशी

वैरागची सर्वपक्षीय नेतेमंडळी लक्ष ठेवून वैराग ग्रामपंचायतीसाठी कोणीच अर्ज दाखल करायचा नाही, असे सर्वपक्षीय बैठकीत निश्चित केले. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी गोडावूनकडे कोणीच फिरकले नाही. तरी ही गावाला चुकवून कोणी अर्ज दाखल करेल, या भीतीपोटी सर्व प्रमुख गटाचे कार्यकर्ते या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपताच राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर, भाजपचे संतोष निंबाळकर, शिवसेनेचे अरुण सावंत, भाजपचे शहराध्यक्ष शिवाजी सुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून याबाबतची

माहिती घेतली.