शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उजनीतून २० मार्चला सोडलेले कालव्याचे पाणी २० मे पर्यंत वाहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST

भीमानगर : उजनी धरणातून २० मार्चपासून कालवा नदीला सोडण्यात आलेले पाणी हे २० मे पर्यंत वाहत राहणार आहे. सद्य ...

भीमानगर : उजनी धरणातून २० मार्चपासून कालवा नदीला सोडण्यात आलेले पाणी हे २० मे पर्यंत वाहत राहणार आहे. सद्य परिस्थितीत उजनी धरणातील पाण्याचा साठा कालव्याच्या दरवाज्याच्या तळातील पातळीपर्यंत जाईपर्यंत कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी ६०० क्युसेक्स पाणी सध्या कालव्यातून सीना नदीत सोडण्यात येत आहे. १० किंवा ११ मे पर्यंत धरणाची पाणी पातळी मायनस (उणे) मध्ये जाणार आहे. तरीदेखील कालव्यातून पाणी सोडणे बंद होणार नसल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

उजनी धरणात ४९१ मीटर उंच पाणी पातळीच्यापुढे धरण प्लस मध्ये गृहीत धरले जाते. त्यामुळे हा जिवंत पाणीसाठा संबोधला जातो. तर ४९१ मीटरच्या खाली मात्र मायनस मृतसाठा संबोधला जातो. धरणाच्या भिंतीत असलेल्या मुख्य कालव्याच्या दरवाजाची तळ पातळी ४८७. २०० मीटर पर्यंत आहे. परंतु ४८८ नंतर पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे कालव्यातून पाणी पुढे जात नाही.

२० मार्च रोजी कालव्यातून ३०० क्युसेक्सने उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी ६४ टक्के होती. ६ मे रोजी ती सहा टक्के आहे. ४८७ .५०० मीटर पातळीपर्यंत कालवा चालू ठेवण्यात येणार असल्यामुळे अंदाजे २० ते २२ मे पर्यंत हे पाणी कालव्यातून वाहत राहील. तोपर्यंत धरणातील पाण्याची पातळी मायनस १४ टक्के ते १५ टक्के पर्यंत निश्चित जाणार आहे. त्यानंतर कालव्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण क्षेत्राला पावसाच्या पाण्याची वाट पहावी लागणार आहे,

सध्य दक्षिण सोलापूर साठी कालव्यातून कुरुल हद्दीतील एस्केएफ् मधून ४५० क्युसेक्स पाणी सीना नदीत सोडले जात आहे. शिरापूर योजना सध्या बंद झाली असल्याने तिकडील १५० क्युसेक्स पाणी येत आहे. अशा प्रकारे एकूण ६०० क्युसेक्स पाणी दक्षिण सोलापूरसाठी सोडले जात आहे.

--

सीना, माढा व दहीगाव सिंचन योजना

लवकरच बंद होणार

सध्या धरणात ४९१. ६९० मीटरपर्यंत पाणी पातळी आहे. ४९१.२०० मीटर पाणीपातळीला सीना माढा सिंचन योजना बंद केली जाते. सध्या सीना माढा सिंचन योजनेसाठी २२५ ते २३५ क्युसेक्सचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे आगामी आठ दिवसात सीना माढा व दहीगाव सिंचन योजना बंद होणार आहे. पावसाळ्या नंतर धरणातील पाणी वाढल्यानंतर या योजना चालू होणार हे निश्चित.

---

बाष्पी भवनामुळे पाणी झाले कमी

२० मार्च रोजी उजनीची टक्केवारी ६१. ६९ टक्के होती. ६ मे ला ६ टक्के आहे. म्हणजेच २० मार्चला उजनीतून कालवा नदी व ईतर योजनांना सोडण्यात आलेल्या उन्हाळी आवर्तनात ४५ दिवसात जवळपास ५५ टक्के पाणी आतापर्यंत उन्हाळी आवर्तनातमुळे व बाष्पीभवनामुळे कमी झाले आहे.

--

६ मे रोजीची धरणाची स्थिती

पाणी पातळी ४९१. ५०० मीटर

एकूण साठा १९१०.०१ दशलक्ष घनमीटर

विसर्ग : ६ टक्के

कालवा ३१५० क्युसेक्स,

बोगदा ६९० क्युसेक्स,

सीना-माढा २९६ क्युसेक्स

दहीगाव ८५ क्युसेक्स

बाष्पीभवन ७. ५५ मिलिमीटर.