शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बक्षीहिप्परगाच्या ओढ्यात बैलगाडी गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:23 IST

रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बक्षीहिप्परगे गावाजवळील ओढ्याला पूर आला आहे. सकाळी नेहमीप्रमाणे येथील शेतकरी बाबासाहेब नवनाथ माने आपल्या बैलगाडीतून ...

रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बक्षीहिप्परगे गावाजवळील ओढ्याला पूर आला आहे. सकाळी नेहमीप्रमाणे येथील शेतकरी बाबासाहेब नवनाथ माने आपल्या बैलगाडीतून शेताकडे निघाले होते. त्यांनी आपल्यासोबत घरातील पाच चिमुकल्यांना गाडीत घेतले. बैलगाडी पुलाच्या काठावर आली असता पाण्याचा अंदाज काही येत नव्हता. काही वेळ विचार करून शेतकऱ्याने बैलगाडी पाण्यात घातली. दरम्यान, प्रवाहाच्या मधोमध गेल्यावर गाडी पाण्यात उलटली आणि प्रवाहाबरोबर वाहू लागली. यावेळी बैलांच्या गळ्याला फास लागल्याने त्यांना बाजूला पडता येईना. त्यामुळे तडफडून दोन्ही बैल पाण्यात बुडाले आणि काही अंतरावर त्यांचे मृतदेह बाहेर आले.

शेतकरी बाबासाहेब माने आणि लक्ष्मण गायकवाड हे बैलगाडीत होते. बैलगाडी उलटताच दोघांनी पाण्यात उड्या मारल्या. लक्ष्मण हे गटांगळ्या खात पाण्याबाहेर आले तर बाबासाहेब माने बैलांना वाचविण्याच्या प्रयत्नात काही अंतर वाहत गेले. शेवटी जीव वाचविण्यासाठी बाहेर पडले म्हणून वाचले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी ओढ्याकडे धाव घेतली. बैलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांचा पंचनामा करण्यात आला. दीड लाख रुपये किमतीची बैलजोडी मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

..............

सात जीव सुदैवाने बचावले

या बैलगाडीत बसून बाबासाहेब माने यांच्या कुटुंबातील पाच मुले शेताकडे निघाली होती. शेजारी राहणारे बळी माने यांनी या चिमुकल्यांना खाली उतरण्यास सांगितले. मौजमजा करण्यासाठी शेताकडे जाणारी चिमुकली ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. शेवटी माने यांनी त्यांना सक्तीने खाली घेतले आणि ओढ्याच्या काठावरून घरी पाठवले म्हणून ती बचावली. बैलगाडी चालक बाबासाहेब माने आणि लक्ष्मण गायकवाड यांनीही प्रसंगावधान राखून ओढ्यात उड्या मारून पैलतीर गाठले. त्यामुळे सातजणांचा जीव वाचला.

..............

पुलाची उंची वाढविण्याची मागणी

बक्षीहिप्परगे गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला मुसळधार पाऊस झाला, तर मोठा पूर येतो. कधी-कधी तर दिवसभर वाहतूक ठप्प होते. दोन वर्षांपूर्वी या पुलावरुन पाणी वाहत असताना एका तरुणाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे या ओढ्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ करत आहेत.

.............

नैसर्गिक आपत्तीत गरीब शेतकऱ्याची बैलजोडी मृत्यूमुखी पडल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून असून, आता त्यांच्याकडे दुसरे साधन नाही. शासनाने शेतकऱ्याला बैलजोडीची किंमत नुकसानभरपाई म्हणून द्यावी.

- विश्रांत गायकवाड, ग्रामस्थ, बक्षीहिप्परगे

................

गावाजवळच्या ओढ्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी जुनी आहे. याबाबत मी स्वतः लक्ष घालत आहे. लवकरात लवकर हा पूल मंजूर होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

- सचिन कल्याणशेट्टी, आमदार, अक्कलकोट