शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बक्षीहिप्परगाच्या ओढ्यात बैलगाडी गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:23 IST

रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बक्षीहिप्परगे गावाजवळील ओढ्याला पूर आला आहे. सकाळी नेहमीप्रमाणे येथील शेतकरी बाबासाहेब नवनाथ माने आपल्या बैलगाडीतून ...

रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बक्षीहिप्परगे गावाजवळील ओढ्याला पूर आला आहे. सकाळी नेहमीप्रमाणे येथील शेतकरी बाबासाहेब नवनाथ माने आपल्या बैलगाडीतून शेताकडे निघाले होते. त्यांनी आपल्यासोबत घरातील पाच चिमुकल्यांना गाडीत घेतले. बैलगाडी पुलाच्या काठावर आली असता पाण्याचा अंदाज काही येत नव्हता. काही वेळ विचार करून शेतकऱ्याने बैलगाडी पाण्यात घातली. दरम्यान, प्रवाहाच्या मधोमध गेल्यावर गाडी पाण्यात उलटली आणि प्रवाहाबरोबर वाहू लागली. यावेळी बैलांच्या गळ्याला फास लागल्याने त्यांना बाजूला पडता येईना. त्यामुळे तडफडून दोन्ही बैल पाण्यात बुडाले आणि काही अंतरावर त्यांचे मृतदेह बाहेर आले.

शेतकरी बाबासाहेब माने आणि लक्ष्मण गायकवाड हे बैलगाडीत होते. बैलगाडी उलटताच दोघांनी पाण्यात उड्या मारल्या. लक्ष्मण हे गटांगळ्या खात पाण्याबाहेर आले तर बाबासाहेब माने बैलांना वाचविण्याच्या प्रयत्नात काही अंतर वाहत गेले. शेवटी जीव वाचविण्यासाठी बाहेर पडले म्हणून वाचले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी ओढ्याकडे धाव घेतली. बैलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांचा पंचनामा करण्यात आला. दीड लाख रुपये किमतीची बैलजोडी मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

..............

सात जीव सुदैवाने बचावले

या बैलगाडीत बसून बाबासाहेब माने यांच्या कुटुंबातील पाच मुले शेताकडे निघाली होती. शेजारी राहणारे बळी माने यांनी या चिमुकल्यांना खाली उतरण्यास सांगितले. मौजमजा करण्यासाठी शेताकडे जाणारी चिमुकली ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. शेवटी माने यांनी त्यांना सक्तीने खाली घेतले आणि ओढ्याच्या काठावरून घरी पाठवले म्हणून ती बचावली. बैलगाडी चालक बाबासाहेब माने आणि लक्ष्मण गायकवाड यांनीही प्रसंगावधान राखून ओढ्यात उड्या मारून पैलतीर गाठले. त्यामुळे सातजणांचा जीव वाचला.

..............

पुलाची उंची वाढविण्याची मागणी

बक्षीहिप्परगे गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला मुसळधार पाऊस झाला, तर मोठा पूर येतो. कधी-कधी तर दिवसभर वाहतूक ठप्प होते. दोन वर्षांपूर्वी या पुलावरुन पाणी वाहत असताना एका तरुणाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे या ओढ्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ करत आहेत.

.............

नैसर्गिक आपत्तीत गरीब शेतकऱ्याची बैलजोडी मृत्यूमुखी पडल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून असून, आता त्यांच्याकडे दुसरे साधन नाही. शासनाने शेतकऱ्याला बैलजोडीची किंमत नुकसानभरपाई म्हणून द्यावी.

- विश्रांत गायकवाड, ग्रामस्थ, बक्षीहिप्परगे

................

गावाजवळच्या ओढ्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी जुनी आहे. याबाबत मी स्वतः लक्ष घालत आहे. लवकरात लवकर हा पूल मंजूर होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

- सचिन कल्याणशेट्टी, आमदार, अक्कलकोट