शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

बक्षीहिप्परगाच्या ओढ्यात बैलगाडी गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:23 IST

रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बक्षीहिप्परगे गावाजवळील ओढ्याला पूर आला आहे. सकाळी नेहमीप्रमाणे येथील शेतकरी बाबासाहेब नवनाथ माने आपल्या बैलगाडीतून ...

रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बक्षीहिप्परगे गावाजवळील ओढ्याला पूर आला आहे. सकाळी नेहमीप्रमाणे येथील शेतकरी बाबासाहेब नवनाथ माने आपल्या बैलगाडीतून शेताकडे निघाले होते. त्यांनी आपल्यासोबत घरातील पाच चिमुकल्यांना गाडीत घेतले. बैलगाडी पुलाच्या काठावर आली असता पाण्याचा अंदाज काही येत नव्हता. काही वेळ विचार करून शेतकऱ्याने बैलगाडी पाण्यात घातली. दरम्यान, प्रवाहाच्या मधोमध गेल्यावर गाडी पाण्यात उलटली आणि प्रवाहाबरोबर वाहू लागली. यावेळी बैलांच्या गळ्याला फास लागल्याने त्यांना बाजूला पडता येईना. त्यामुळे तडफडून दोन्ही बैल पाण्यात बुडाले आणि काही अंतरावर त्यांचे मृतदेह बाहेर आले.

शेतकरी बाबासाहेब माने आणि लक्ष्मण गायकवाड हे बैलगाडीत होते. बैलगाडी उलटताच दोघांनी पाण्यात उड्या मारल्या. लक्ष्मण हे गटांगळ्या खात पाण्याबाहेर आले तर बाबासाहेब माने बैलांना वाचविण्याच्या प्रयत्नात काही अंतर वाहत गेले. शेवटी जीव वाचविण्यासाठी बाहेर पडले म्हणून वाचले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी ओढ्याकडे धाव घेतली. बैलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांचा पंचनामा करण्यात आला. दीड लाख रुपये किमतीची बैलजोडी मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

..............

सात जीव सुदैवाने बचावले

या बैलगाडीत बसून बाबासाहेब माने यांच्या कुटुंबातील पाच मुले शेताकडे निघाली होती. शेजारी राहणारे बळी माने यांनी या चिमुकल्यांना खाली उतरण्यास सांगितले. मौजमजा करण्यासाठी शेताकडे जाणारी चिमुकली ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. शेवटी माने यांनी त्यांना सक्तीने खाली घेतले आणि ओढ्याच्या काठावरून घरी पाठवले म्हणून ती बचावली. बैलगाडी चालक बाबासाहेब माने आणि लक्ष्मण गायकवाड यांनीही प्रसंगावधान राखून ओढ्यात उड्या मारून पैलतीर गाठले. त्यामुळे सातजणांचा जीव वाचला.

..............

पुलाची उंची वाढविण्याची मागणी

बक्षीहिप्परगे गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला मुसळधार पाऊस झाला, तर मोठा पूर येतो. कधी-कधी तर दिवसभर वाहतूक ठप्प होते. दोन वर्षांपूर्वी या पुलावरुन पाणी वाहत असताना एका तरुणाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे या ओढ्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ करत आहेत.

.............

नैसर्गिक आपत्तीत गरीब शेतकऱ्याची बैलजोडी मृत्यूमुखी पडल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून असून, आता त्यांच्याकडे दुसरे साधन नाही. शासनाने शेतकऱ्याला बैलजोडीची किंमत नुकसानभरपाई म्हणून द्यावी.

- विश्रांत गायकवाड, ग्रामस्थ, बक्षीहिप्परगे

................

गावाजवळच्या ओढ्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी जुनी आहे. याबाबत मी स्वतः लक्ष घालत आहे. लवकरात लवकर हा पूल मंजूर होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

- सचिन कल्याणशेट्टी, आमदार, अक्कलकोट