शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वधू-वरांवर अक्षतांऐवजी फुलांचा वर्षाव

By admin | Updated: December 16, 2014 00:41 IST

गडहिंग्लजमध्ये नवा सामाजिक अध्याय : प्रथमच महिलांनी लावला विवाह

रवींद्र येसादे- उत्तूर -सनई-चौघडा, पै-पाहुण्यांची रेलचेल, आगत-स्वागत, लिंगायत धर्म संस्कृती अनुसार बसवेश्वर महाराजांनी घालून दिलेल्या रूढी, परंपरेनुसार उत्तूर (ता. आजरा) येथील डॉ. भालचंद्र तौकरी यांच्या चिरंजीव व कन्या यांच्या विवाह सोहळ्यातील कार्यक्रम महिलांनीच पूर्ण केला. गडहिंग्लज येथील गणेश मंगल कार्यालयात डॉ. समीर यांचा विवाह डॉ. सारिका (रा. हिसूक वडगाव, जि. बीड) हिच्याशी, तर कन्या चि. सौ. का. सम्रीता हिचा विवाह चि. ओमकारेश्वर बटकडली (रा. आजरा) यांच्यासोबत विधीवतपणे साजरा करण्यात आला.संपूर्ण लग्नविधीचा कार्यक्रम महिलाच करणार असल्यामुळे विवाहाला एक वेगळेपण होते. विवाहाची पद्धत कशी असणार याची माहिती पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी यांना उत्सुकता होती.लग्नसमारंभ कसा असावा, अक्षता का नको, अन्नाची नासाडी न करता फुलांचा वर्षाव का करावा याबाबतची माहिती महिला प्रदेश काँगे्रस कमिटीच्या उपाध्यक्ष सरलाताई पाटील, राजशेखर तंबाके , चि. यश आंबोळे यांनी आपल्या अनुभवातून माहिती दिली.म. बसवेश्वरांनी लग्नाची पद्धत कशी असावी, स्त्री-पुरुष समानता कशी असावी, याबाबतची माहिती धारवाडच्या बसव केंद्राच्या सविता नडकट्टी यांनी दिली व भगिनी मंडळींनी म. बसवेश्वरांवरील गीते, दोहे यातून नातेवाइकांना संदेश दिला.सकाळी ११.३० पासून विधीला सुरुवात झाली. लग्नमंडपातील सर्व विधी पार पडल्यानंतर १ वाजता विवाहस्थळी वधू-वरांना बोलावण्यात आले. कल्याण महोत्सवाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कल्याण महोत्सवासाठी वधू-वर येत असताना त्यांचे स्वागत करण्यात आले. मंडपात आल्यानंतर शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या अतिथींनी जोरदार स्वागत केले.वधू-वरांकडून म. बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून कल्याण महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. प्रथम वधू-वरांनी वचन प्रार्थना घेतली. पती-पत्नीने कसे वागले पाहिजे, संसार कसा केला पाहिजे हे वदवून घेतले. त्यानंतर गौरव समर्पण, आशीर्वचन, भावोदक सिद्धता आणि प्रोक्षण विभुती धारणा, रूद्राक्षधारणा, वचनगंठण, प्रतिज्ञावचन, वचनमांगल्य व रूद्राक्षमांगल्यधारणा आदी विधी महिलांनी पूर्ण केल्या.विवाहस्थळी ८ मंत्रांचा उच्चार करून अक्षताऐवजी वधू-वरांवर फुलांचा वर्षाव आई-वडिलांकडून करण्यात आला. त्यानंतर वधू-वर स्टेजवरून खाली आल्यानंतर सर्वांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.या साऱ्या कामाचे सूत्रसंचालन जयश्री तोडकर, अशोक भोईटे यांनी केले. या आगळ्या-वेगळ्या विवाह सोहळ्यास आजरा, गडहिंग्लज, चंदगड, बेळगाव, कोल्हापूर आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाहास अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, जि.प.सदस्य उमेश आपटे, वसंतराव धुरे, अशोक चराटी, अनंतराव आजगावकर, बी. जी. पोतदार आदींसह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजता हरिद्रालेपण हा विधी झाला.५सर्व विधी मराठीतूनच !विवाह सोहळ्यातील सर्व विधी मराठी भाषेतून झाले. क्रियाविधी करणाऱ्या या महिला कर्नाटकातील धारवाड येथील होत्या. त्यांनी मराठी भाषा समजून घेऊन विधी शांततेत पार पडला.गडहिंग्लज येथे डॉ. समीर व डॉ. सारिका आणि सम्रीता व ओमकारेश्वर बटकडली या नवविवाहितांच्या हस्ते ध्वजारोहण करून विवाहसोहळ्याचा प्रारंभ झाला.