शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वधू-वरांवर अक्षतांऐवजी फुलांचा वर्षाव

By admin | Updated: December 16, 2014 00:41 IST

गडहिंग्लजमध्ये नवा सामाजिक अध्याय : प्रथमच महिलांनी लावला विवाह

रवींद्र येसादे- उत्तूर -सनई-चौघडा, पै-पाहुण्यांची रेलचेल, आगत-स्वागत, लिंगायत धर्म संस्कृती अनुसार बसवेश्वर महाराजांनी घालून दिलेल्या रूढी, परंपरेनुसार उत्तूर (ता. आजरा) येथील डॉ. भालचंद्र तौकरी यांच्या चिरंजीव व कन्या यांच्या विवाह सोहळ्यातील कार्यक्रम महिलांनीच पूर्ण केला. गडहिंग्लज येथील गणेश मंगल कार्यालयात डॉ. समीर यांचा विवाह डॉ. सारिका (रा. हिसूक वडगाव, जि. बीड) हिच्याशी, तर कन्या चि. सौ. का. सम्रीता हिचा विवाह चि. ओमकारेश्वर बटकडली (रा. आजरा) यांच्यासोबत विधीवतपणे साजरा करण्यात आला.संपूर्ण लग्नविधीचा कार्यक्रम महिलाच करणार असल्यामुळे विवाहाला एक वेगळेपण होते. विवाहाची पद्धत कशी असणार याची माहिती पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी यांना उत्सुकता होती.लग्नसमारंभ कसा असावा, अक्षता का नको, अन्नाची नासाडी न करता फुलांचा वर्षाव का करावा याबाबतची माहिती महिला प्रदेश काँगे्रस कमिटीच्या उपाध्यक्ष सरलाताई पाटील, राजशेखर तंबाके , चि. यश आंबोळे यांनी आपल्या अनुभवातून माहिती दिली.म. बसवेश्वरांनी लग्नाची पद्धत कशी असावी, स्त्री-पुरुष समानता कशी असावी, याबाबतची माहिती धारवाडच्या बसव केंद्राच्या सविता नडकट्टी यांनी दिली व भगिनी मंडळींनी म. बसवेश्वरांवरील गीते, दोहे यातून नातेवाइकांना संदेश दिला.सकाळी ११.३० पासून विधीला सुरुवात झाली. लग्नमंडपातील सर्व विधी पार पडल्यानंतर १ वाजता विवाहस्थळी वधू-वरांना बोलावण्यात आले. कल्याण महोत्सवाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कल्याण महोत्सवासाठी वधू-वर येत असताना त्यांचे स्वागत करण्यात आले. मंडपात आल्यानंतर शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या अतिथींनी जोरदार स्वागत केले.वधू-वरांकडून म. बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून कल्याण महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. प्रथम वधू-वरांनी वचन प्रार्थना घेतली. पती-पत्नीने कसे वागले पाहिजे, संसार कसा केला पाहिजे हे वदवून घेतले. त्यानंतर गौरव समर्पण, आशीर्वचन, भावोदक सिद्धता आणि प्रोक्षण विभुती धारणा, रूद्राक्षधारणा, वचनगंठण, प्रतिज्ञावचन, वचनमांगल्य व रूद्राक्षमांगल्यधारणा आदी विधी महिलांनी पूर्ण केल्या.विवाहस्थळी ८ मंत्रांचा उच्चार करून अक्षताऐवजी वधू-वरांवर फुलांचा वर्षाव आई-वडिलांकडून करण्यात आला. त्यानंतर वधू-वर स्टेजवरून खाली आल्यानंतर सर्वांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.या साऱ्या कामाचे सूत्रसंचालन जयश्री तोडकर, अशोक भोईटे यांनी केले. या आगळ्या-वेगळ्या विवाह सोहळ्यास आजरा, गडहिंग्लज, चंदगड, बेळगाव, कोल्हापूर आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाहास अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, जि.प.सदस्य उमेश आपटे, वसंतराव धुरे, अशोक चराटी, अनंतराव आजगावकर, बी. जी. पोतदार आदींसह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजता हरिद्रालेपण हा विधी झाला.५सर्व विधी मराठीतूनच !विवाह सोहळ्यातील सर्व विधी मराठी भाषेतून झाले. क्रियाविधी करणाऱ्या या महिला कर्नाटकातील धारवाड येथील होत्या. त्यांनी मराठी भाषा समजून घेऊन विधी शांततेत पार पडला.गडहिंग्लज येथे डॉ. समीर व डॉ. सारिका आणि सम्रीता व ओमकारेश्वर बटकडली या नवविवाहितांच्या हस्ते ध्वजारोहण करून विवाहसोहळ्याचा प्रारंभ झाला.