शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटणाऱ्या बहाद्दूर हौसाक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:24 IST

हौसाक्का पाटील चार वर्षांच्या असताना त्यांच्या मातेचं निधन झालं. क्रांतिसिंहांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या ...

हौसाक्का पाटील चार वर्षांच्या असताना त्यांच्या मातेचं निधन झालं. क्रांतिसिंहांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या वंशाचा दिवा आहे, असे म्हणून त्यांना सांभाळलं. चिमुकल्या वयामध्ये हौसाक्का हातात तिरंगा घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध रस्त्यावरती आल्या. त्यांच्या जडणघडणीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांना वेळ मिळाला नाही.

हौसाक्का यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि ब्रिटिशांचं जुलमी राज्य नष्ट व्हावं, यासाठी निर्भीडपणे लढा उभारला. सुरलीच्या घाटात ब्रिटिशांच्या गाडीवर छापा टाकला. वांगी इथला ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. भवानीनगर रेल्वे स्थानकावर इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी वेषांतर करून योजना आखली आणि ती त्यांनी यशस्वी करून दाखविली. गोवा स्वतंत्र व्हावा यासाठी त्या मांडवी नदी पार करून पणजीत पोहोचल्या. छत्रपती संभाजीराजे यांच्यानंतर मांडवी नदी पार करण्याचे सामर्थ्य हौसाक्का पाटील यांच्यामध्येच होते.

पुरुषांप्रमाणे स्त्रियादेखील हिंमतवान, निर्भीड, लढवय्या आणि महाबुद्धिमान असतात हे हौसाक्कांनी दाखवून दिलं. त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतरही त्या शांत बसल्या नाहीत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये त्यांनी उडी घेतली. कष्टकरी, कामकरी, शेतकरी यांना न्याय मिळावा, यासाठी सतत शासन व्यवस्थेविरुद्ध लढत राहिल्या. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्या सतत संघर्ष करत राहिल्या.

तत्कालीन फडणवीस सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिल्यानंतर हौसाक्का चवताळून उठल्या. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्यांनी जाहीर सभेत या पुरस्काराला विरोध केला. सांगलीत शिवसन्मान जागर परिषदेमध्ये काहीजणांनी जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला, त्यावेळेस त्याच कार्यक्रमात हातात काठी घेऊन त्या उभ्या राहिल्या.

हौसाक्का पाटील यांची हिंमत, निर्भीडपणा, स्वाभिमान, बाणेदारपणा, तळमळ, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील. त्या केवळ क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या आणि भाई भगवानराव मोरे पाटील यांच्या पत्नी एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही तर, त्या देखील स्वतः शूर, निर्भीड आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या.

हौसाक्कांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. इंग्रजांनी त्यांच्या घरावरती अनेकवेळा छापा टाकला. बालपणापासून त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यानंतरही अनेक आंदोलनांमध्ये त्यांना तुरुंगवास झाला. पण, त्या डगमगल्या नाहीत. संकटसमयी त्या लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या.

त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभले. त्यांच्या मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपलं. त्यामुळे त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभलं. हौसाक्का पाटील या स्वातंत्र्यासाठी लढल्या. आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरती त्या अनंतात विलीन झाल्या. इतिहास पाहिलेल्या, इतिहास घडवलेल्या आणि वर्तमानाला प्रेरणा देणाऱ्या त्या ऐतिहासिक महामानव आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता आपल्या सर्वांना व्यथित करणारी आहे.

आम्ही हौसाक्का पाटील यांना अनेकवेळा भेटायला जायचो. त्यामुळे त्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यांना पाहिल्यानंतर प्रेरणा मिळत असे. त्या इतिहासातील महामानव आहेत तर, वर्तमानातील दीपस्तंभ आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

- डॉ. श्रीमंत कोकाटे (लेखक इतिहास संशोधक आहेत.)

-----