शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी आॅक्टोबरचा मुर्हुत कशाला, आ़ प्रणिती शिंदे यांचा भाजप सरकारला सवाल

By admin | Updated: June 8, 2017 15:22 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : शेतकरी बांधवांना कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव मिळावे, यासाठी कॉंग्रेस पक्षाचा सतत प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी कॉंग्रेससह सरकार विरोधी सर्व पक्षांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली. १ जूनरोजी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप सुरु केला आहे. या संपाला पहिल्या दिवसापासून आपला पाठींबा होता. अल्पभूधारक शेतकऱ्यांना १ आॅक्टोंबरपर्यंत कर्जमाफी देणार असल्याची घोषणा केली जात आहे. मग, कर्जमाफी करायचीच असेल तर त्यासाठी मुर्हूत कशाला हवा असा प्रश्नही आ. प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.भाजप सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ सुरु केलाय. शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही अत्यंत दुदैर्वी बाब आहे. कॉग्रेस सरकारच्या काळात असे कधीही घडले नव्हते. भाजपाचे सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या हालअपेष्ठा सुरु झाल्यात सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता तात्काळ कर्जमाफी द्यावी. अन्यथा सुरु असणारे आंदोलन अधिक तीव्र करु, अशी तंबीही आ. प्रणिती शिंदे यांनी सरकारला दिली.भाजप सरकारकडून शेतकऱ्यांंच्या शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची मदत नाही. कर्जमाफी नाही. सत्तेच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांंना निवडणूकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले. परंतु सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर यांचा आजही अभ्यासच सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत त्यामुळे त्यांची कुटूंबे रस्त्यावर येत आहेत. तरीदेखील या सरकारला काहीच वेदना होत नाहीत. ही अत्यंत खेदाची बाब आहे.