शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

साखर उताऱ्यात यंदा मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:19 IST

यामुळे यंदा बहुतांश कारखान्यांची एफआरपी कमी निघाली आहे. चालू हंगामात जिल्ह्यातील एकाही कारखान्याचा साखर उतारा दहा टक्क्यांवर गेला नाही. ...

यामुळे यंदा बहुतांश कारखान्यांची एफआरपी कमी निघाली आहे. चालू हंगामात जिल्ह्यातील एकाही कारखान्याचा साखर उतारा दहा टक्क्यांवर गेला नाही. त्यामुळे पुढील वर्षीही एफआरपी कमी मिळणार अशी चिंता ऊस उत्पादकांना लागून राहिली आहे. प्रतिटन उसापासून किती साखरेचे उत्पादन होते यावर सध्या दर निश्चित होत असल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून साखर कारखानदारांचा साखर उतारा कमी दाखवत आहेत. जिल्ह्यात कारखान्यांना एफआरपी कमी दिसत आहे. याबाबत शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

गेल्या हंगामात टनाला अडीच हजार रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांना पुढील हंगामात दोन हजारांच्या आतच दर मिळतो की काय अशी चिंता शेतकऱ्यांना ग्रासली आहे. चालू गळीत हंगामात सरासरी साडेआठ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या गाळप हंगामाच्या तुलनेत साखर उतारा दीड ते दोन टक्क्याने घटला आहे. एफआरपी हा उसाचा अंतिम दर नाही असे सी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार कारखान्याच्या महसूल उत्पादनावर आधारित दर देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार साखर व उपपदार्थ उत्पादनाच्या एकूण उत्पादनातील ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागते तोच अंतिम भाव ठरतो.

सोलापूर जिल्ह्यामध्ये सलग तीन वर्षे साखर उतारा घटत आहे त्यामुळे दरवर्षी एफआरपी कमी होत चालली आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी असे २५ कारखाने जवळपास ३९ लाख ८३ हजार २३२ ऊस गाळपाचे गाळप करून ३२ लाख ८३ हजार ४८२ साखर व त्याचे उत्पादन करून ८.२४ टक्के साखर उतारा घेतला.

----

असा आहे उतारा

साखर उतारा सहा डिसेंबर २०२० अखेरच्या ऊस गाळपाचा साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार सहकार महर्षी ९.४० टक्के सरासरी साखर उतारा, सिद्धेश्वर ५.१ टक्के, श्री विठ्ठल ५.०३, भीमा टाकळी ६.२५, श्री पांडुरंग ९.३३, श्री संत दामाजी ७.६४, वसंतराव काळे चंद्रभागा ७.२८ टक्के, विठ्ठलराव शिंदे ८.६४, कूर्मदास ८.३८, लोकनेते अनगर ८.८५ सासवड माळी ८.४५, विठ्ठल कॉर्पोरेशन ६.७९, लोकमंगल शुगर ७.६, सिद्धनाथ शुगर ७.१२, भैरवनाथ शुगर ७.९८, इंद्रेश्वर शुगर ७.२५, विठ्ठलराव शिंदे २.१, युटोपियन शुगर ७.४९, भैरवनाथ शुगर ८.९९, भैरवनाथ ५.५९, जयहिंद ८.३२, बबनराव शिंदे ९.०९, विठ्ठल रिफायनरी पॉईंट, गोकुळ माऊली ६.९टक्के. साखर उतारा सुरुवातीच्या गळीत हंगामात निघत आहे.

----एफआरपीवर पडणार फरक

गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये सरासरी साखर उतारा ११.२७ टक्के होता. २०१९-२० मध्ये ९.५२ टक्के होता. चालू गळीत हंगामात सुरुवातीला २०२०-२१ मध्ये ८.२५ टक्के साखर उतारा निघत आहे. सलग तीन वर्षे उताऱ्यामध्ये घट होत चालली आहे. त्यामुळे याचा परिणाम पुढील वर्षी एफआरपीवर पडणार आहे.