शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

थकबाकीत बिबीदारफळ, नान्नज, कळमण, देगावची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:40 IST

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात शेतीपंपाची सर्वाधिक थकबाकी बिबीदारफळ त्यानंतर नान्नज व कळमण येथील शेतकऱ्यांकडे असल्याचे उपकार्यकारी अभियंता संतोष ...

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात शेतीपंपाची सर्वाधिक थकबाकी बिबीदारफळ त्यानंतर नान्नज व कळमण येथील शेतकऱ्यांकडे असल्याचे उपकार्यकारी अभियंता संतोष कैरमकोंडा यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी वीज बिल भरून सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन कैरमकोंडा यांनी केले आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील १३ हजार ८६ शेतकऱ्यांकडे मूळ थकबाकी १०४ कोटी चार लाख ८४५ रुपये इतकी आहे. यावरील दंड व व्याजाचे ४५ कोटी रुपये तर वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासन माफ करणार आहे. तालुक्यातील बिबीदारफळ गावात ८३० शेतकऱ्यांकडे ६६३ लाख, नान्नज येथील ८०१ शेतकऱ्यांकडे ६३५ लाख, कळमणच्या ७१५ शेतकऱ्यांकडे ६०५ लाख रुपये थकबाकी आहे. देगाव येथील ८२४ शेतकऱ्यांकडे ७०७ लाख रुपये, पाथरी येथे ५९० शेतकऱ्यांकडे ५२१ लाख, डोणगाव येथील ५८३ शेतकऱ्यांकडे ४९५ लाख, पाकणीत ४०० शेतकऱ्यांकडे ३०४ लाख, रानमसले येथील ६४४ शेतकऱ्यांकडे ५७३ लाख, मार्डी येथील ५६८ शेतकऱ्यांकडे ४०२ लाख, अकोलेकाटी ३९१ शेतकऱ्यांकडे ३२५ लाख, तिर्हे ४१५ शेतकऱ्यांकडे ३७५ लाख, हिरज ४२७ शेतकऱ्यांकडे ३३१ लाख, नंदूर ३५० शेतकऱ्यांकडे ३४६ लाख, वडाळा येथील ४३३ शेतकऱ्यांकडे २५५ लाख, बाळे येथील ३६७ शेतकऱ्यांकडे ३३४ लाख, बाणेगाव येथील ३२६ शेतकऱ्यांकडे २६८ लाख, कारंबा येथील ३६२ शेतकऱ्यांकडे २२६ लाख, कौठाळी येथील २९२ शेतकऱ्यांकडे २२९ लाख, गावडीदारफळ येथील ३११शेतकऱ्यांकडे २२६ लाख, पडसाळी येथील ३०३ शेतकऱ्यांकडे २७१ लाख, बेलाटी येथील ३०९ शेतकऱ्यांकडे २३० लाख रुपये इतकी थकबाकी आहे.

कवठे येथील २१३ शेतकऱ्यांकडे १७४ लाख, कोंडी येथील १७४ शेतकऱ्यांकडे १४८ लाख, शिवणी येथील १६५ शेतकऱ्यांकडे १४९ लाख, गुळवंची येथील २२९ शेतकऱ्यांकडे १४४ लाख, हगलूर १८९ शेतकऱ्यांकडे १५९ लाख रुपये थकबाकी आहे. यापैकी ५० टक्के रक्कम भरल्यास ५० टक्क्यांपर्यंत वीज बिल माफ होणार आहे.

--

शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळेना

उत्तर सोलापूर तालुक्यात सिद्धेश्वर, लोकमंगल व सिद्धनाथ हे तीन साखर कारखाने आहेत. याशिवाय इतरही कारखान्यांना तालुक्यातील ऊस तोडणी झाला आहे. मात्र, बिले मिळाली नाहीत. इतरही कारणे असतील. मात्र, शेतकरी वीज बिल भरण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.