शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:22 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताला लाभलेलं विद्वान असं रत्न होतं. विद्येचा वाण त्यांच्या रोमारोमात तेजोमय तळपत होता. माणूस एखाद्या ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताला लाभलेलं विद्वान असं रत्न होतं. विद्येचा वाण त्यांच्या रोमारोमात तेजोमय तळपत होता. माणूस एखाद्या क्षेत्रात निष्णात असू शकतो, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानसशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, कायदेशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक क्षेत्रात डॉक्टर होते. विविध विषयांवरील डाॅक्टरेट या पदव्या ते लिलया भूषवत होते. परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळविणारे ते पहिले भारतीय होते. दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट व डी.एससी पदव्या मिळविणारे पहिले दक्षिण आशियाई म्हणून बाबासाहेब होते. त्यांच्या जीवनात भारतातील सर्वाधिक प्रतिभाशाली व उच्चविद्याविभूषित व्यक्ती व शक्ती म्हणून त्यांचा गौरव व आदर होता. १८९६ ते १९२३ या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थामधून उच्च शिक्षण घेतले. अनेक पदव्यांचे ते मानकरी होते नव्हे तर पदवीला त्यांच्या अभ्यासातील नैपुण्यामुळे पदवी मिळत असे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी जगप्रसिद्ध कायदेपंडित जेनिंग यांची भेट घेऊन भारताची राज्यघटना लिहिण्याची विनंती केली तेव्हा जेनिंग सरांनी सांगितले हे काम माझ्यापेक्षा माझे गुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्टपणे करू शकतात. पुढे बाबासाहेबांनी ते केलेही.

भारतीय घटनेचा सरनामा अर्थात संविधान हे संपूर्ण घटनेचा सार आहे. बाबासाहेबांच्या लोककल्याणकारी विचारांची एकाग्रता, सूक्ष्मता, भव्यता, सर्वांगीण परिपक्वता, विद्वत्ता, नियोजनबद्धता, देशवासीयांबद्दलची प्रेमळ दिशादर्शकता सिद्ध होते. वंचित व उपेक्षित घटकांच्या विकासासाठी त्यांनी केलेले नियोजन आजही मार्गदर्शक आहे.

भारतीय घटनेत सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता, एकात्मता, अखंडता, बंधूता ही मार्गदर्शक तत्त्वे बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक रोवली. ती दीपस्तंभ आहेत. सामान्य व्यक्ती हा त्यांच्या जीवनप्रवाहाचा प्राण होता. कोणावरही अन्याय होऊ नये, त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असा बाबासाहेबांचा कटाक्ष होता. गुलामगिरीत राहणे किंवा ठेवणे हा मानवजातीला कलंक आहे ही त्यांची विचारधारा आपल्याला खरा मानवधर्म शिकवते. संधीची समानता आणि समानतेतील संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे असा बाबासाहेबांचा आग्रह होता. विषमता हा रोग नष्ट व्हावा यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. मानवतावाद हाच खरा धर्म आहे. धर्माच्या नावाखाली अधर्म होऊ नये यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. दुर्दैवाने आजही त्यांनी सांगितलेला अर्थ शोधण्यात व वागण्यात आजही समाजात अपुरेपणा जाणवतो.

विद्या, विनय आणि शील ही बाबासाहेबांची दैवते होती. आयुष्यभर विद्यार्थी म्हणून शिकण्यात आणि समाजशिक्षक म्हणून देशवासीयांना शिकवण्यात बाबासाहेबांना आनंद वाटत होता. पुस्तके आपली मित्र आहेत तर ग्रंथ हे गुरू आहेत ही त्यांची शिकवण अजरामर आहे. विनयतेशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. शिक्षणामुळे विनयता यावी, दुर्बलता नाही असं त्यांना मनोमन वाटे. चारित्र्य हेच खरे शिक्षण ही आचारसंहिता आम्हाला बाबासाहेबांनी दिली. शिक्षणातून दृष्टी यावी, दुष्टता नाही हा त्यांचा विचार संपूर्ण मानवजातीला विचारप्रर्वतक आहे.

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा बाबासाहेबांचा जीवनसंदेश आहे. शिक्षण हे जीवनमूल्ये विकसित करण्यासाठी शिका व समाजातील गुन्हेगारी संपविण्यासाठी संघटित व्हा असा मौलिक विचार त्यांनी रुजविला. संघटित होऊन गुन्हेगारी होत असेल तर ती बाबासाहेबांच्या विचारांची व आचारांची प्रतारणा होईल हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. जर शिक्षणातून, विधायक मार्गाने प्रश्न सुटत नसतील तर संघर्ष केलाच पाहिजे, तो आपला नैसर्गिक हक्क आहे असे ते ठामपणे सांगतात. बाबासाहेबांचा विचार, आचार, संचार, प्रचार तमाम भारतीयांसाठी अनंतकाळ आधार होवो...त्यांच्या मनीचा भाव आपल्या तनामनातून समभाव होवो हीच सदिच्छा..

- ह.भ.प.रंगनाथ काकडे गुरुजी.

श्री निवास, विद्यानगर, वैराग.