शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

खते, बियाणांची फसवणूक टाळण्यासाठी भरारी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST

बार्शी तालुका हा रब्बीचा तालुका असला तरी, मागील काही वर्षांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी वाढली आहे. ...

बार्शी तालुका हा रब्बीचा तालुका असला तरी, मागील काही वर्षांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी वाढली आहे. या हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग सतर्क झाला आहे. फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच कृषी निविष्ठा खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट अथवा भेसळयुक्त बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांची खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पक्क्या पावतीसह खरेदी करावी. पावतीवर पीक, वाण संपूर्ण लॉट नंबर, बियाणे, खते, कीटकनाशके, कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव नमूद असावे. तसेच पावतीवर विक्रेत्याची व खरेदीदाराची स्वाक्षरी अथवा अंगठा असल्याशिवाय पावती स्वीकारू नये, असे आवाहन केले आहे.

एवढ्या खतांची केली मागणी...

या हंगामात खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी नोंदवली आहे. त्यामध्ये युरिया १०१६४, डीएपी ३५३७, एसएसपी २५६७, एन.पी.के संयुक्त ४९४४, एमओपी २१५३, अशी एकूण २३३६५ मेट्रिक टन खताची मागणी नोंदवलेली आहे. सद्यस्थितीला युरिया ९५०, डीएपी ५३५, एसएसपी ९१०, एनपीके संयुक्त २३९६, एमओपी २७२ असा ५०६३ टन खत साठा शिल्लक आहे.

-----

भरारी पथकाची नियुक्ती

बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची विक्री सुरळीत होण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय भरारी पथक नेमले आहे. यामध्ये निरीक्षक वजन मापे मंडल कृषी अधिकारी (संबंधीत कार्यक्षेत्र) कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ), पंचायत समिती हे सचिव असणार आहेत.

चौकट

खरीप हंगाम सन २०२१ मध्ये बार्शी तालुक्यात खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र ७८००० हे. असून त्यामध्ये खालीलप्रमाणे पिकांचे क्षेत्र व बियाणांची आवश्यकता आहे. तूर - ८६०० हेक्टर बियाणे ८८६ क्विंटल, सोयाबीन - ५०,००० हेक्टर बियाणे १५००० क्विंटल, मका - ६०० हेक्टर बियाणे १२० क्विंटल, उडीद ११४००, हेक्टर बियाणे २३५ क्विंटल, मूग - १९०० हेक्टर बियाणे २९ क्विंटल, कांदा- ५५००, हेक्टर बियाणे ४४० क्विंटल. हे सर्व बियाणे सार्वजनिक व खासगी बाजारातून उपलब्ध होणार आहे.

चौकट

बार्शी तालुक्यात प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण खते दुकानावर गर्दी करणे हे आपल्या व आपल्या कुटुंबीयांसाठी अतिशय धोकादायक आहे. तालुक्यातील गावा-गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपणास लागणाऱ्या खतांची यादी शेतकरीनिहाय बनवून कृषी विभागातील संबंधीत कर्मचाऱ्यास संपर्क केल्यास कृषी विभाग आपल्या गावातच खते पाेहोच करण्याची व्यवस्था करेल, असे शहाजी कदम यांनी सांगितले.

-----