शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

रिमझिम पावसात कर्मचाऱ्याचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:28 IST

दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम रिमझिम पावसात आपल्या रोजीरोटीसाठी कोरोना कालावधीत काम करूनही उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. आमचे प्रश्न ...

दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम रिमझिम पावसात आपल्या रोजीरोटीसाठी कोरोना कालावधीत काम करूनही उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. आमचे प्रश्न सोडवा या मागणीसाठी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी कर्मचाऱ्यांना बोलावून तुमचे प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावू, असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात १० ऑगस्ट २०२० च्या परिपत्रकानुसार सुधारित वेतन मिळावे, किमान वेतन व महागाई भत्ता यातील फरकाची रक्कम मिळावी, सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळावा, ग्रामपंचायत कर्मचारीसंदर्भातील सेवा पुस्तके व इतर सर्व रजिस्टर माहितीसह अद्ययावत करावीत, अशी मागणी केली होती.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील, शिवाजी भालेराव, मनोज कांबळे, ज्ञानेश्वर खजूरकर, मनोहर कांबळे, दादासाहेब वाघमारे, श्रीमंत जाधव, तुकाराम क्षीरसागर, विठ्ठल राठोड, आकाश होमकर गैबी साहेब मुल्ला आदींची उपस्थिती होती.

----

उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांचे बहुतांशी प्रश्न ग्रामपंचायत स्तरावरच सुटणारे आहेत. यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेची लवकरात लवकर बैठक बोलावू. त्यांचे प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावू.

-गणेश मोरे, गटविकास अधिकारी

----

पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेले ग्रामपंचायत कर्मचारी.