शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

११ महिने बार्शी टेक्स्टाईल मिल बंद, पावणेचारशे कामगारांवर बेरोजगारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:21 IST

नुकतेच माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून मिल सुरू करण्यासाठी केंद्र शासनाचे लक्ष वेधले. आता ...

नुकतेच माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून मिल सुरू करण्यासाठी केंद्र शासनाचे लक्ष वेधले. आता तरी ही मिल सुरू व्हावी, अशी या कामगारांची अपेक्षा आहे. सोलापूर प्रमाणेच गिरणगाव म्हणून शतकभरापूर्वी ओळख असणाऱ्या बार्शीतील राजन मिल व लोकमान्य मिल या सूतगिरण्या काळाच्या ओघात बंद पडल्या. काकासाहेब झाडबुके यांनी स्थापन केलेल्या जयशंकर मिलचे १९७४ साली राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडे हस्तांतरण झाले. आज राज्यामध्ये सूत निर्मिती करणाऱ्या पाच सूतगिरण्यामध्ये बार्शीची मिल अग्रेसर आहे. या मिलमध्ये १७५ कायम असलेले ६० बदली असणारे १३५ कंत्राटी असे कामगार काम करतात.

केंद्र सरकारने टाळेबंदी घोषित केल्यानंतर बार्शी टेक्सटाईल् मिलदेखील बंद करण्यात आली. त्यानंतर आता मार्च महिन्याच्या २३ दिवसाच्या हजेरी पटावरील कार्यकाळाचे निकष लावून कायम कामगारांना त्यापैकी निम्मे वेतन दिले जाते. हे वेतन अत्यंत तुटपुंजे असून कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीचे संकट आहे. मिळेल ते काम करून गुजराण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, खासदार ओमराजे निंबाळकर व अन्य नेते तसेच इंटक व अन्य कामगार संघटनाही अनलॉक झाल्यानंतर मिल सुरू करण्याबाबत सातत्याने लेखी निवेदने देऊन पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्यापही या गिरणीचा भोंगा वाजण्यासाठी केंद्राकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या या प्रलंबित निर्णयामुळे आज तरी कामगार हवालदिल झाले आहेत.

नेत्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी

या मिलमध्ये आम्हाला कामगार म्हणून उपजीविकेचे सुरक्षित साधन होते. गेली ११ महिने मिल बंद असल्यामुळे आम्हाला अगदी अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. मिल सुरू करण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत व केंद्राने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी मनिषा देवरे, नंदा कुलकर्णी, शीला लंकेश्वर, लक्ष्मी मोहिते यांनी केली आहे.

कोट :::::::::::

बार्शी टेक्साईल मिल सुरु होण्यावर ४०० कामगारांचे संसार अवलंबून आहेत. अचलपूर व दादर येथील सूत गिरण्या सुरू करण्याबाबत केंद्र शासनाने ही तत्परता दाखविली. त्याच पद्धतीने बार्शीतील मिल सुरू करण्याबाबतही तातडीने निर्णय होण्याची गरज आहे.

- नागनाथ सोनवणे,

इंटक नेते