शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेग

By admin | Updated: January 31, 2017 17:27 IST

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेग

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेगशहाजी फुरडे-पाटील - बार्शी आॅनलाईन लोकमतबार्शी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपल्याच हातात पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सूत्रे यावीत यासाठी गुप्त खलबताद्वारे रणनिती आखत उमेदवाऱ्या नेमक्या कोणत्या गावात, कोणाला द्यायची हे गणीत मांडत असताना राष्ट्रवादीचे आ़ दिलीप सोपल व शिवसेनेचे राजेंद्र राऊत ही नेतेमंडळी निवडणुकीसाठी जनसंपर्काबरोबरच अर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहेत़ त्यामुळे यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार असे दिसत आहे़ बार्शी तालुक्यात जि़प़च्या सहा तर पंचायत समितीच्या बारा जागा आहेत़ या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी ही झाली आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाला किती जागा सोडणार हे अद्यापी दोन्ही काँग्रेसने जाहीर केलेले नाही, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससाठी जागा सोडणार की काँग्रेसच्याच उमेदवाराला त्यांच्या हातात घड्याळ बांधायला लावणार हे देखील अद्यापी गुलदस्त्यातच आहे़ गेल्या पंधरा दिवसापासून आ़ दिलीप सोपल यांनी ही निवडणुक अतिशय गांभीर्याने घेतली असल्याचे त्यांच्या हाचालीवरुन दिसून येत आहे़ इकडे शिवसेनेमध्ये देखील वातावरण कांहीसे गंभीर झाल्याचे जाणवत आहे, शिवसेनेचे माजी आ़ राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख , पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी जिल्ह्यातील आघाडीसंदर्भात चर्चा सुरु ठेवल्याने तसेच सहकार मंत्र्यांनी देखील जिल्ह्यातील निवडणुक ही आघाडी करुन कोणत्या तालुक्यात कोणत्या नेत्याने कोणत्या चिन्हावर निवडणुक लढवायची आहे, याबाबत विचारमंथन सुरु असल्याचे सांगीतलेले आहे, त्यामुळे जिल्ह्याबरोबरच तालुक्यात नेमके कोणाला कोणते निवडणुक चिन्ह मिळणार याची देखील मोठी उत्सुकता लागली आहे़ माजी आ़ राजेंद्र राऊत हे बार्शी तालुक्यात भाजपाबरोबरच युती करण्याच्या मुडमध्ये आहेत, मात्र त्यांच्या या भूमिकेबाबत अद्यापी शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी होय नाही असे कांहीही सांगीतलेले नाही, त्यामुळे राऊत यांच्या या युतीच्या धोरणाला शिवसेना संमती देणार की नाही, आणि जर शिवसेनेने संमती दिली नाही तर राऊत पुढे कोणते धोरण अवलंबणार याबाबत तालुक्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु आहे़ या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत हे काय निर्णय घेणार यावरच या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे़ --------------------------आयाराम-गयारामकोणतीही निवडणुक म्हटले की आयाराम -गयाराम ची चलतीच असते, यंदाही निवडणुकीच्या तोंडावर नेते व कार्यकर्त्यांनी पक्ष बदलाच्या हालचाली सुरु केल्या असून अनेक कार्यकर्ते शिवसेनेतून राष्ट्रवादीतून कांही जण राष्ट्रवादीतून शिवसेनेतून प्रवेश करु लागले आहेत़ ------------------------पैसा आणि निवडणूकनिवडणूक अन् पैसा हे समीकरण तयार झाले असून निवडणूक आयोगाने कितीही काटेकोर नियम लावले तरी राजकीय पक्ष व उमेदवार कोट्यवधी रुपये निवडणुकीवर खर्च करीत असतात, त्यामुळे गरीब कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचे दिवस आता संपले आहेत, त्यामुळे दोन्ही राजकीय पक्ष हे आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांना किंवा ज्याठिकाणी महिला आरक्षण आहे अशा ठिकाणी अधिकारी किंवा उद्योजक असलेल्याच्या पत्नी किंवा आईला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत़ त्यामुळे नोटा बंदी असली तरी पैशाचा मात्र भरपूर चुराडा निवडणुकीत होणार हे खरे आहे़