शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेग

By admin | Updated: January 31, 2017 17:27 IST

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेग

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेगशहाजी फुरडे-पाटील - बार्शी आॅनलाईन लोकमतबार्शी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपल्याच हातात पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सूत्रे यावीत यासाठी गुप्त खलबताद्वारे रणनिती आखत उमेदवाऱ्या नेमक्या कोणत्या गावात, कोणाला द्यायची हे गणीत मांडत असताना राष्ट्रवादीचे आ़ दिलीप सोपल व शिवसेनेचे राजेंद्र राऊत ही नेतेमंडळी निवडणुकीसाठी जनसंपर्काबरोबरच अर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहेत़ त्यामुळे यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार असे दिसत आहे़ बार्शी तालुक्यात जि़प़च्या सहा तर पंचायत समितीच्या बारा जागा आहेत़ या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी ही झाली आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाला किती जागा सोडणार हे अद्यापी दोन्ही काँग्रेसने जाहीर केलेले नाही, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससाठी जागा सोडणार की काँग्रेसच्याच उमेदवाराला त्यांच्या हातात घड्याळ बांधायला लावणार हे देखील अद्यापी गुलदस्त्यातच आहे़ गेल्या पंधरा दिवसापासून आ़ दिलीप सोपल यांनी ही निवडणुक अतिशय गांभीर्याने घेतली असल्याचे त्यांच्या हाचालीवरुन दिसून येत आहे़ इकडे शिवसेनेमध्ये देखील वातावरण कांहीसे गंभीर झाल्याचे जाणवत आहे, शिवसेनेचे माजी आ़ राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख , पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी जिल्ह्यातील आघाडीसंदर्भात चर्चा सुरु ठेवल्याने तसेच सहकार मंत्र्यांनी देखील जिल्ह्यातील निवडणुक ही आघाडी करुन कोणत्या तालुक्यात कोणत्या नेत्याने कोणत्या चिन्हावर निवडणुक लढवायची आहे, याबाबत विचारमंथन सुरु असल्याचे सांगीतलेले आहे, त्यामुळे जिल्ह्याबरोबरच तालुक्यात नेमके कोणाला कोणते निवडणुक चिन्ह मिळणार याची देखील मोठी उत्सुकता लागली आहे़ माजी आ़ राजेंद्र राऊत हे बार्शी तालुक्यात भाजपाबरोबरच युती करण्याच्या मुडमध्ये आहेत, मात्र त्यांच्या या भूमिकेबाबत अद्यापी शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी होय नाही असे कांहीही सांगीतलेले नाही, त्यामुळे राऊत यांच्या या युतीच्या धोरणाला शिवसेना संमती देणार की नाही, आणि जर शिवसेनेने संमती दिली नाही तर राऊत पुढे कोणते धोरण अवलंबणार याबाबत तालुक्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु आहे़ या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत हे काय निर्णय घेणार यावरच या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे़ --------------------------आयाराम-गयारामकोणतीही निवडणुक म्हटले की आयाराम -गयाराम ची चलतीच असते, यंदाही निवडणुकीच्या तोंडावर नेते व कार्यकर्त्यांनी पक्ष बदलाच्या हालचाली सुरु केल्या असून अनेक कार्यकर्ते शिवसेनेतून राष्ट्रवादीतून कांही जण राष्ट्रवादीतून शिवसेनेतून प्रवेश करु लागले आहेत़ ------------------------पैसा आणि निवडणूकनिवडणूक अन् पैसा हे समीकरण तयार झाले असून निवडणूक आयोगाने कितीही काटेकोर नियम लावले तरी राजकीय पक्ष व उमेदवार कोट्यवधी रुपये निवडणुकीवर खर्च करीत असतात, त्यामुळे गरीब कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचे दिवस आता संपले आहेत, त्यामुळे दोन्ही राजकीय पक्ष हे आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांना किंवा ज्याठिकाणी महिला आरक्षण आहे अशा ठिकाणी अधिकारी किंवा उद्योजक असलेल्याच्या पत्नी किंवा आईला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत़ त्यामुळे नोटा बंदी असली तरी पैशाचा मात्र भरपूर चुराडा निवडणुकीत होणार हे खरे आहे़