शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

बार्शी बाजार समितीत नव्याने ३०० कट्टे तुरीची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST

बार्शी: कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरीप हंगामातील नवीन तुरीची विक्रीसाठी आवक झाली आहे. तुरीला ५७०० ते ६१०० ...

बार्शी: कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरीप हंगामातील नवीन तुरीची विक्रीसाठी आवक झाली आहे. तुरीला ५७०० ते ६१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. शुक्रवारी बाजारात ३०० कट्टे तुरीची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे यांनी दिली. येत्या १५ दिवसांत आवक आणखी वाढेल अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती ही भुसार मालाची उतारपेठ म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. यंदा बाजारात उडीद, सोयाबीनची विक्रमी आवक झाली. दोन दिवसापासून तुरीची आवकही सुरू झाली आहे़. सध्या बाजारात ज्वारीची हजार कट्टे आवक असून, दर १५०० ते ४९०० रुपये मिळत आहे. सोयाबीनची आवक पाच हजार कट्टे आहे. याला दर ००० ते ४०५० रुपये मिळत आहे. हरभऱ्याची ७०० कट्टे आवक असून, दर ३,५०० ते ४,१०० दिला गेला. मक्याची आवक ५०० कट्टे झाली असून, दर ११०० ते १४५० रुपये दिला गेला. उडदाची आवक ४०० कट्टे आणि दर ३००० ते ७००० रुपये दिला गेला आहे.

तुरीची काढणीला आता सुरुवात झाली आहे. पुढील १५ दिवसांत आवक ही मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज जगदाळे यांनी व्यक्त केला. यावेळी बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, अ‍ॅड. सागर रोडे, व्यापारी नागजी राऊत उपस्थित होते.

--

वजन होताच पट्टी हातात

बार्शीच्या बाजारात तूर, उडीद, सोयाबीन, हरभरा,ज्वारी या शेतमालांचे मोठे खरेदीदार आहेत. तसेच शेतकऱ्यांना पट्टीदेखील वजन होताच दिली जाते. त्यामुळे याठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात आहे. बार्शीत दिलीप खटोड, मैनुद्दीन तांबोळी, कादर तांबोळी, दिलीप गांधी, सोमाणी बंधू या उद्योजकांचे तूरडाळीचे २० कारखाने आहेत. त्यामुळे याठिकाणी तुरीला मागणीदेखील जास्त आहे.