शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

वडापुरात धरणाऐवजी त्याच जागेत होणार बॅरेजेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST

सोलापूर : भीमा नदीवर वडापूर येथे बॅरेजेस बांधण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार ...

सोलापूर : भीमा नदीवर वडापूर येथे बॅरेजेस बांधण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सध्याच्या कोल्हापूर बंधाऱ्यानजीकच नव्या बॅरेजेसचे बांधकाम करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भीमा नदीवर वडापूर येथे धरण बांधण्याची मागणी केली जात होती. ही मागणी अधूनमधून राजकीय पातळीवर होत असली तरी त्यासंबंधीचा अधिकृत प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे नव्हता. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना धरण मंजूर कधी होणार, या प्रश्नाने ग्रासले होते. आता याच ठिकाणी धरणाऐवजी बॅरेजेसचे काम हाती घेण्यात येणार असल्याने धरणाचा प्रश्न कायमचा निकाली लागणार यावर शिक्कामोर्तब होण्यास मदत होईल.

वडापूर येथे सध्या अस्तित्वात असलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा १९७८ साली बांधण्यात आला होता. गत ४० वर्षांत या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी फारसा खर्च न केल्याने बंधाऱ्याची पडझड झाली. बंधाऱ्याच्या पायातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. येथील पाण्याच्या भरवशावर बागायती पिके घेतली जातात. मात्र, बंधाऱ्यातून पाण्याची गळती सुरू झाल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर धरण बांधण्याची मागणी जोर धरत राहिली.

--------

नियोजित धरणाच्या जागीच बॅरेजेस

भीमा नदीवर ज्या जागी धरण बांधण्याची मागणी केली जात होती, त्याच ठिकाणी आता बॅरेजेस होणार आहेत. अस्तित्वात असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात साठत होते तितकेच म्हणजे ०.२७ टीएमसी (४७०० सहस्र घनमीटर) पाणीसाठा होणार आहे.

-------

धरणासाठी अयोग्य साइट-तज्ज्ञांचा अहवाल

वडापूर येथे भीमा नदीचे पात्र मोठे विस्तारलेले आहे. खोलगट आहे. त्यामुळे या ठिकाणी धरण होण्याची मागणी होत होती. शेतकऱ्यांतून ही मागणी होत असली तरी नियोजित जागा धरणासाठी अयोग्य असल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने यापूर्वीच सादर केला आहे. धरण बांधणे आणि त्यात मुबलक पाणीसाठा करण्यासाठी दोन्ही बाजूला टेकडीसदृश स्थितीची साइट लागते. खोलगट दरीही आवश्यक ठरते. तशी साइट नसल्याने धरणाऐवजी बॅरेजेसचा प्रस्ताव स्वीकारावा लागल्याची माहिती जलसंपदा विभागाचे उपअभियंता बाळासाहेब घोडके यांनी दिली.

-------

भूसंपादनाच्या ३० कोटींची बचत

भीमा नदीपात्रात वडापूर येथे धरण बांधल्यास काळी सुपीक जमीन पाणलोट क्षेत्रासाठी संपादित करावी लागणार आहे. शेतकऱ्यांचा या भूसंपादनाला कडाडून विरोध आहे. धरणाऐवजी बॅरेजेस बांधल्याने भूसंपादनाची गरज नाही. त्यासाठी लागणाऱ्या ३० कोटी रकमेची बचत होण्यास मदत होईल, अशीही बाजू जलसंपदा विभागाने शासनाला सादर केलेल्या प्रस्तावातून मांडली आहे.

--------

२१.९० कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

चार वर्षांपूर्वी वडापूर बॅरेजेसचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जलसंपदा खात्याने सादर केलेल्या २१.९० कोटी खर्चास नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रस्ताव जुना असल्याने नवीन वाढीव खर्चाचा त्यात समावेश नाही. सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे.

-------

वडापूर येथील बंधाऱ्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असली तरी तांत्रिक मान्यता घ्यावी लागेल. नाशिक येथील जलविज्ञान व नियोजन मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना या कार्यालयांकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे.

-बाळासाहेब घोडके

उपअभियंता,

जलसंपदा विभाग, सोलापूर