शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अगुस्ता खरेदीमध्ये लाचखोरी झाली - ओवेसी

By admin | Updated: May 8, 2016 13:44 IST

अगुस्ता वेस्टलॅन्ड घोटाळ्यात भ्रष्टाचार झाला आहे, हे नक्की; पण दोन वर्षे मोदी सरकार काय करत होते.

ऑनलाइन लोकमत 
सोलापूर, दि. ८ - अगुस्ता वेस्टलॅन्ड घोटाळ्यात भ्रष्टाचार झाला आहे, हे नक्की; पण दोन वर्षे मोदी सरकार काय करत होते. या घोटाळ्यावरून भाजपा आणि काँग्रेस एकमेकांवर चिखलफेक करून नाहकपणे संसदेचा वेळ वाया घालवित आहेत. या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करून त्याची दररोज सुनावणी करावी आणि दूरचित्रवाणीवरून ती प्रसारित करावी, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए मुस्लमीनचे नेते खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी सोलापूर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी ते बोलत होते़.
 
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ओवेसी येथे आले असून, सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अगुस्ता प्रकरणावरून जो गोंधळ सुरू आहे, त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. भविष्यात कोणतीही शस्त्रास्त्रे खरेदी करण्याच्या प्रक्रियेत कोणताही अधिकारी सहभागी होणार नाही. त्यामुळे शस्त्र खरेदी रखडली जाऊन सुरक्षा धोक्यात येईल. 'अगुस्ता' खरेदीमध्ये लाचखोरी झाली असताना मोदी सरकारने दोन वर्षे काय केले?, असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर काँग्रेस आणि भाजपाने गंभीर झाले पाहिजे, असे आवाहन केले.
 
'एमआयएम'चे प्रस्थ वाढत असल्यामुळे भाजपाला फायदा होत असल्याच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसला आता स्वत:ला सावरता येईना. हरियाणा, जम्मू - काश्मीर, दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष पराभूत झाला. आता आमच्यावर हे आरोप करीत आहेत. मी आरोपांना सन्मान म्हणून स्वीकारतो. देशातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या कामगिरीवर त्यांनी असमाधान व्यक्त केले. 
 
राज्यात पाचशे शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतानाही केंद्राकडून दुष्काळासाठी पुरेशी मदत आली नाही, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस आ. इम्तियाज जलील, पक्षाचे शहराध्यक्ष तौफिक शेख व पदाधिकारी उपस्थित होते.
 
दोन वर्षे मोदी सरकारने काय केले
आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी यांना आव्हान देण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न होत आहेत ;पण यावर आताच भाष्य नको 'दिल्ली अभी बहुत दूर है' असे विधान खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केले.