शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

अगुस्ता खरेदीमध्ये लाचखोरी झाली - ओवेसी

By admin | Updated: May 8, 2016 13:44 IST

अगुस्ता वेस्टलॅन्ड घोटाळ्यात भ्रष्टाचार झाला आहे, हे नक्की; पण दोन वर्षे मोदी सरकार काय करत होते.

ऑनलाइन लोकमत 
सोलापूर, दि. ८ - अगुस्ता वेस्टलॅन्ड घोटाळ्यात भ्रष्टाचार झाला आहे, हे नक्की; पण दोन वर्षे मोदी सरकार काय करत होते. या घोटाळ्यावरून भाजपा आणि काँग्रेस एकमेकांवर चिखलफेक करून नाहकपणे संसदेचा वेळ वाया घालवित आहेत. या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करून त्याची दररोज सुनावणी करावी आणि दूरचित्रवाणीवरून ती प्रसारित करावी, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए मुस्लमीनचे नेते खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी सोलापूर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी ते बोलत होते़.
 
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ओवेसी येथे आले असून, सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अगुस्ता प्रकरणावरून जो गोंधळ सुरू आहे, त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. भविष्यात कोणतीही शस्त्रास्त्रे खरेदी करण्याच्या प्रक्रियेत कोणताही अधिकारी सहभागी होणार नाही. त्यामुळे शस्त्र खरेदी रखडली जाऊन सुरक्षा धोक्यात येईल. 'अगुस्ता' खरेदीमध्ये लाचखोरी झाली असताना मोदी सरकारने दोन वर्षे काय केले?, असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर काँग्रेस आणि भाजपाने गंभीर झाले पाहिजे, असे आवाहन केले.
 
'एमआयएम'चे प्रस्थ वाढत असल्यामुळे भाजपाला फायदा होत असल्याच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसला आता स्वत:ला सावरता येईना. हरियाणा, जम्मू - काश्मीर, दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष पराभूत झाला. आता आमच्यावर हे आरोप करीत आहेत. मी आरोपांना सन्मान म्हणून स्वीकारतो. देशातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या कामगिरीवर त्यांनी असमाधान व्यक्त केले. 
 
राज्यात पाचशे शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतानाही केंद्राकडून दुष्काळासाठी पुरेशी मदत आली नाही, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस आ. इम्तियाज जलील, पक्षाचे शहराध्यक्ष तौफिक शेख व पदाधिकारी उपस्थित होते.
 
दोन वर्षे मोदी सरकारने काय केले
आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी यांना आव्हान देण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न होत आहेत ;पण यावर आताच भाष्य नको 'दिल्ली अभी बहुत दूर है' असे विधान खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केले.