शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या धोरणामुळे बळीराजाचा उडतोय गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST

माळशिरस : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या कृषी व्यवसायाला नैसर्गिक संकटांचा सामना काही नवीन नाही. सध्या शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीबाबत महावितरण, ...

माळशिरस : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या कृषी व्यवसायाला नैसर्गिक संकटांचा सामना काही नवीन नाही. सध्या शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीबाबत महावितरण, सत्ताधारी व विरोधी पक्ष, संघटना यांच्या बदलत्या धोरणामुळे नेमका कोणता निर्णय घ्यावा, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विजेचे बिल न भरल्यास वीजपुरवठ्याची देखभाल कशी करायची? तर सरकारही आपल्या निर्णयाबाबत धरसोड करत आहे. विरोधी पक्ष वीजतोडणीविरूद्ध आक्रमक आहे. यामुळे शेतकरी मात्र संभ्रमात आहेत.

महावितरणचा गाडा हाकण्यासाठी पैशांची गरज असल्याने बिलांच्या वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. सत्तेत नसताना वीजबिल भरू नका, म्हणणारे नेते सरकारमध्ये आल्यानंतर वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देत आहेत. मनसे, शेतकरी संघटनेसह काही संघटना वीजबिलाविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत तर विरोधी पक्ष शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करू नये, यासाठी आग्रही भूमिका मांडत आहे. त्यामुळे नेमके वीजबिल भरावे की नको, याबाबत शेतकरी संभ्रमात सापडला आहे.

वीजबिलाबाबत बळीराजा चिंतातूर

आपण वापरत असलेल्या विजेचे पैसे भरण्याबाबत शेतकऱ्यांचे दुमत नाही. मात्र, दुष्काळ, अतिवृष्टी, हवामानातील अनिश्चितता, कोरोना महामारी, बेभरवशी बाजारभाव व पिकांवरील वाढत्या रोगांमुळे शेतीचा खर्च व उत्पन्न याचे बिघडलेले गणित, सत्तेची पोळी भाजण्यासाठी विविध पक्षांनी दिलेली वीजबिल माफीची आश्वासनं यामुळे वीजबिलांचा डोंगर वाढत गेला. यामुळे वीजबिल भरणे सध्या शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शेतकरी सध्या वीजबिलाबाबत चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.

कोट ::::::::::::::::::::

सध्याची योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे. या रकमेतून थेट निधी वापरला जातो. शिवाय शेतकऱ्यांना योग्य क्षमतेने व वेळेत वीज मिळण्यासाठी वीजबिलाचा भरणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व लाभ घ्यावा.

- ए. एल. वडार

कार्यकारी अभियंता, अकलूज

कोट ::::::::::::::::::

शेतकऱ्यांनी वीजबिल भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या योजनेत हप्त्याने बिल भरण्याची सुविधा असावी. सध्या कोरोना महामारी व इतर संकटांमुळे कृषी व्यवसाय संकटात असल्याने मुदतवाढ मिळावी, वीजपुरवठा कायम राहावा.

- उपेंद्र केसकर

अध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत