शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या धोरणामुळे बळीराजाचा उडतोय गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST

माळशिरस : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या कृषी व्यवसायाला नैसर्गिक संकटांचा सामना काही नवीन नाही. सध्या शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीबाबत महावितरण, ...

माळशिरस : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या कृषी व्यवसायाला नैसर्गिक संकटांचा सामना काही नवीन नाही. सध्या शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीबाबत महावितरण, सत्ताधारी व विरोधी पक्ष, संघटना यांच्या बदलत्या धोरणामुळे नेमका कोणता निर्णय घ्यावा, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विजेचे बिल न भरल्यास वीजपुरवठ्याची देखभाल कशी करायची? तर सरकारही आपल्या निर्णयाबाबत धरसोड करत आहे. विरोधी पक्ष वीजतोडणीविरूद्ध आक्रमक आहे. यामुळे शेतकरी मात्र संभ्रमात आहेत.

महावितरणचा गाडा हाकण्यासाठी पैशांची गरज असल्याने बिलांच्या वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. सत्तेत नसताना वीजबिल भरू नका, म्हणणारे नेते सरकारमध्ये आल्यानंतर वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देत आहेत. मनसे, शेतकरी संघटनेसह काही संघटना वीजबिलाविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत तर विरोधी पक्ष शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करू नये, यासाठी आग्रही भूमिका मांडत आहे. त्यामुळे नेमके वीजबिल भरावे की नको, याबाबत शेतकरी संभ्रमात सापडला आहे.

वीजबिलाबाबत बळीराजा चिंतातूर

आपण वापरत असलेल्या विजेचे पैसे भरण्याबाबत शेतकऱ्यांचे दुमत नाही. मात्र, दुष्काळ, अतिवृष्टी, हवामानातील अनिश्चितता, कोरोना महामारी, बेभरवशी बाजारभाव व पिकांवरील वाढत्या रोगांमुळे शेतीचा खर्च व उत्पन्न याचे बिघडलेले गणित, सत्तेची पोळी भाजण्यासाठी विविध पक्षांनी दिलेली वीजबिल माफीची आश्वासनं यामुळे वीजबिलांचा डोंगर वाढत गेला. यामुळे वीजबिल भरणे सध्या शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शेतकरी सध्या वीजबिलाबाबत चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.

कोट ::::::::::::::::::::

सध्याची योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे. या रकमेतून थेट निधी वापरला जातो. शिवाय शेतकऱ्यांना योग्य क्षमतेने व वेळेत वीज मिळण्यासाठी वीजबिलाचा भरणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व लाभ घ्यावा.

- ए. एल. वडार

कार्यकारी अभियंता, अकलूज

कोट ::::::::::::::::::

शेतकऱ्यांनी वीजबिल भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या योजनेत हप्त्याने बिल भरण्याची सुविधा असावी. सध्या कोरोना महामारी व इतर संकटांमुळे कृषी व्यवसाय संकटात असल्याने मुदतवाढ मिळावी, वीजपुरवठा कायम राहावा.

- उपेंद्र केसकर

अध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत