शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिथं उठायची पंगत तिथंच भरली माणुसकीची बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST

चपळगाव : जिथं उठायची हजारो स्वामी समर्थ भक्तांच्या पंगती तिथंच या कोरोनाकाळात गोरगरिबांना मदतीसाठी माणुसकीची बॅग भरल्याचे चित्र अन्नछत्र ...

चपळगाव : जिथं उठायची हजारो स्वामी समर्थ भक्तांच्या पंगती तिथंच या कोरोनाकाळात गोरगरिबांना मदतीसाठी माणुसकीची बॅग भरल्याचे चित्र अन्नछत्र मंडळाच्या सभामंडपात दिसून आले. ३८ दिवसात ३१ हजार गोरगरिबांना स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि जयहिंद फूड बँक यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

वंचितांच्या घरापर्यंत जाऊन हे अन्नदान करण्यात आले.

संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले आणि न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जयहिंद फूड बँकेचे अंकुश चौगुले, अशोक जाधव, योगेश पवार, हिरा बंदपट्टे, दादा लोणारी, सूरज जाधव, अतिश पवार, महेश निंबोळे, आकाश चौगुले, अमित कोळी, सागर पवार, मुदसर तांबोळी, नारायण वाघमोडे, ओंकार कांबळे, सिद्धू लव्हारे, प्रज्वल पाटोळे, विकास पवार, महेश भोसले यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

---

अन्नधान्याचे किट वाटणार

लाॅकडाऊनमध्ये छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या कित्येक कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे. अक्कलकोट शहरातील गरजू लोकांसाठी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे मागील ३८ दिवसांपासून रोज अन्नदान करण्यात येत आहे, पण जिथे तयार अन्न पोहोचवू शकत नाही अशा ठिकाणच्या गरजू लोकांसाठी ज्यांचे व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्या चुली बंद पडल्या आहेत, अशा गरजू हजार कुटुंबासाठी किमान १५ ते २० दिवस पुरेल असे अन्नधान्याचे किट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.