शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

आषाढी वारी चुकली म्हणून हसापुरात हरिनामाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST

गुरव महाराज यांचे अख्खे कुटुंब दरवर्षी पंढरपूर वारीत सामील होत असे. यामुळे त्यांना मोठे मानसिक समाधान लाभत असे. अशाप्रकारे ...

गुरव महाराज यांचे अख्खे कुटुंब दरवर्षी पंढरपूर वारीत सामील होत असे. यामुळे त्यांना मोठे मानसिक समाधान लाभत असे. अशाप्रकारे सलग तीस वर्षे पायी वारी सुरू होती. दोन वर्षांपासून वारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत धार्मिक कार्यक्रम करत राहावे, यामुळे मानसिक शांती, समाधान लाभते म्हणून स्वतःच्या शेतात एका पत्राशेडमध्ये सलग २१ दिवस अखंड हरिनामाचा गजर सुरू केला आहे. रोज शेकडो भाविक, भजन, दर्शनासाठी येत आहेत.

विठ्ठलाच्या प्रतिमेला रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी विधीवत पूजापाठ, सायंकाळी आरती, भजन केले जाते. यासाठी भीमाशंकर गुरव, विश्वनाथ गुरव, चंद्रशेखर गुरव, प्रवीण गुरव, गणेश पाटील, लक्ष्मण केंद्रे, श्रीमंत सुतार, आदींचा सहभाग आहे. चप्पळगाव, दहिटणे, भुरीकवटे, हसापूर, आदी गावचे भजन मंडळ आपली सेवा रुजू करीत आहेत. कार्यक्रमासाठी मुतणा गुरव, अर्जुन गुरव, श्रीदेवी स्वामी परिश्रम घेत आहेत.

----

मान्यवरांनी नोंदवला सहभाग

यंदा २ जुलै रोजी या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात कुरनूरचे ह.भ.प. आबा महाराज व ज्येष्ठ साहित्यिक हेरंबराज पाठक यांच्या हस्ते पूजापाठ करून झाली. १५ दिवसांत जमादार महाराज (अकलूज), हंचाटे महाराज (वागदरी, ता. अक्कलकोट), राजकुमार पाटील महाराज, महादेव बिराजदार महाराज (हाळ वागदरी, ता. तुळजापूर) यांच्यासह बाबूराव रामदे, धुळप्पा भजे, मल्लिनाथ स्वामी, विद्याधर गुरव, आदींनी भेट देऊन हरिनाम जागरामध्ये सहभाग नोंदवला.

----

फोटोओळ : १७अक्कलकोट

हसापूर (ता. अक्कलकोट) येथील शिवारात सलग एकवीस दिवस अखंड हरिनामाचा जागर सुरु आहे. यावेळई जप मौन व्रत करणारे ह.भ.प. काशीनाथ गुरव महाराज.