शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

१५ ऑगस्ट घेऊन येतोय 'हर घर तिरंगा', सोलापूरचे पोस्टमन घरपोच देणार ध्वज

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 8, 2023 18:34 IST

डाक कार्यालयाने कंबर कसली : जिल्ह्यातील ११०० ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचले अभियान

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : मागील वर्षीप्रमाणे यंदाही ' हर घर तिरंगा ' अभियान राबविले जाणार आहे. नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने भारतीय डाक विभागाने त्यांच्या सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूरमधील जिल्हा डाक कार्यालयाने १२ हजार ध्वज मागविले आहेत. याशिवाय जिल्ह्यात ग्रामपंचायती, पंचायत समित्या, शासकीय कार्यालयांनाही २५ रुपयांत ध्वज पोहोचवले जात आहे.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ' हर घर तिरंगा ' अभियान सुरू करण्यात आले आहे. २०२२ मध्ये देशभरातील २३ कोटी नागरिकांनी स्वत:च्या घरावर प्रत्यक्ष तिरंगा फडकविला होता. या उपक्रमात टपाल विभागाने मोठे योगदान दिले होते.

यावर्षीही देशभक्तीची हीच भावना समोर ठेवून भारत सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या काळात ' हर घर तिरंगा ' अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. यासाठी भारतीय टपाल कार्यालयातून राष्ट्रध्वजांची विक्री सुरू करण्यात येणार आहे. www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावर ई-टपाल सुविधेच्या माध्यमातून २५ रुपयांत राष्ट्रध्वज घेता येणार आहे.सेल्फी काढून अपलोड करा फोटो..

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या या कार्यक्रमाशी नागरिक जोडले जावेत म्हणून टपाल कार्यालयाने ' हर घर तिरंगा ' हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांना त्यांच्या घरावर तसेच कार्यालयांवर फडकवलेल्या राष्ट्रध्वजासह सेल्फी फोटो #indiapost4Tiranga, #HarDilTiranga. #HargharTiranga या हॅशटॅगसह समाज माध्यमांवर अपलोड करता येईल.तिरंग्यासाठी जवळच्या पोस्टात जा..

हर घर तिरंगा २.० अंतर्गत पोस्ट विभाग भारताचा राष्ट्रध्वज पुरवत आहे. राष्ट्रध्वजाचा आकार २० इंच x ३० इंच (ध्वज खांबाशिवाय) आहे. हा ध्वज आपण आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमधून मिळवू शकता.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन