शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शाळेत ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST

सोलापूर : शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी ५० टक्के शिक्षकांनाच शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ...

सोलापूर : शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी ५० टक्के शिक्षकांनाच शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या तुलनेत मुख्याध्यापक अथवा उच्च महाविद्यालयाचे प्राचार्य यांची अवघी १० टक्के उपस्थिती राहणार आहे.

कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद असल्यातरी शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

राज्याचे शिक्षण संचालक द.गो.जगताप यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षांसाठी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत नियमावली जाहीर केली आहे.

इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वीच्या वर्गाला शिकवणारे ५० टक्के शिक्षक उपस्थित राहतील. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीच्या वर्गाला शिकवणारे १०० टक्के शिक्षक शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. लिपिक, शिपाई , प्रयोगशाळा सहायक आदी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहेत.

प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १० टक्के उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या वर्गाचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून मर्यादित वेळेत हा निकाल घोषित करावयाचा असल्याने अशा सर्वच शिक्षकांना शाळेत १०० टक्के उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता सर्वच शिक्षकांना घ्यावी लागणार आहे.