शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर महाराष्ट्र अन् सौराष्ट्रच्या फिरकीपट्टूंचा बोलबाला

By appasaheb.patil | Updated: February 3, 2024 19:32 IST

सामन्यात दोन्ही संघाचे पारडे जड, अंकित बावणेच्या स्वरूपात संघाला दुसरा धक्का लागला वैयक्तिक २५ धावांवर पार्थ भूट च्या षटकात पारेख मंकड द्वारे झेलबाद झाला.

सोलापूर : येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी सामन्यात दोन्ही संघातील फिरकीपटूंनी दिवस गाजविला. सौराष्ट्र संघाने महाराष्ट्र संघापुढे २०८ धावांचे लक्ष्य ठेवले असून आज रविवारी सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे. 

दरम्यान, दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघाचा २९ षटकात ७ गडी बाद ११६ धावावरून पुढे चालू झाला असता, पहिल्या सत्रात खेळाची सुरुवात तरणजीतसिंग डील्लन आणि अझीम काझी यांनी केले परंतु दुसऱ्या दिवशीच्या ६ व्या षटकातच महाराष्ट्र संघाचा ८ वा गडी बाद झाला.अझीम काझी युवरासिंग दोडियाचा शिकार बनला. त्यानंतर तरणजीतसिंग डील्लन याने २१ धावा केल्या असता, पार्थ भुट द्वारे पायचीत झाला. हितेश वाळुंज याने १३ धावा केल्या. महाराष्ट्र संघ एकूण ४५ षटकात १५९ धावांवर गारद झाला . सौराष्ट्र संघाला पहिल्या डावात ४३ धावांची आघाडी मिळाली.

सौराष्ट्र संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खूप निराशाजनक झाली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच प्रदिप दाढे याने हार्विक देसाई शून्य वरती यश्टीरक्षक विशांत मोरे द्वारे झेलबाद करत तंबूत परत पाठवले. त्यापाठोपाठ केविन जिवराजानी चौथ्या षटकात हितेश वाळुंजने प्रदिप दाढे द्वारे झेलबाद करत परत पाठवले. त्यानंतर सौराष्ट्र संघाची  अवघ्या १० षटकात ५ बाद १६ धावा अशी अवस्था झाली. चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा प्रेक्षकांना निराश केले. विश्वराजसिंह जडेजा आणि पारेख मंकड यांनी पुन्हा एकदा सौराष्ट्र संघाचा डाव सावरत ६ व्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. परंतु विश्वराजसिंह जडेजा वैयक्तिक ३९ धावांवर खेळत असताना हितेश वाळुंज याचा चेंडू थेट स्टंपवर जावून आदळला. त्यापाठोपाठ धर्मेंद्र जडेजा सुद्धा लगेच २१ धावांवर शिकार झाला. त्यानंतर मात्र जयदेव उनाडकट आणि चिराग जानी यांनी महाराष्ट्र संघाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ९ विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. जयदेव उनाडकट याने वैयक्तिक ४५ तर चिराग जानी याने वैयक्तिक ४३ धावा करत संघाला धावसंख्या उभारण्यास योगदान दिले. सौराष्ट्र संघाचा दुसरा डाव ४३.२ षटकात १६४ धावांवर संपुष्टात आला. त्याला अझीम काझी आणि प्रदीप दाढे यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत उत्तम साथ दिली.

महाराष्ट्र संघाची दुसऱ्या डावात ओम भोसले व कौशल तांबे यांनी डावाची सुरुवात केली. परंतु कौशल तांबे वैयक्तिक १६ धावांवर युवराजसिंग दोडियाच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर आलेल्या अंकित बावणे व सलामीचा फलंदाज ओम भोसले यांनी दुसऱ्या विकेट साठी ३५ धावांची भागीदारी केली. अंकित बावणेच्या स्वरूपात संघाला दुसरा धक्का लागला वैयक्तिक २५ धावांवर पार्थ भूट च्या षटकात पारेख मंकड द्वारे झेलबाद झाला. त्यापाठोपाठ ओम भोसले देखील १६ धावांवर तंबूत परतला.त्याला सुद्धा पार्थ भूट ने  पारेख मंकड द्वारे झेलबाद केले. त्यानंतर विषांत मोरे व अझीम काझी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत चौथ्या गड्यासाठी २३ धावांची भागीदारी केली, मात्र १९ व्या षटकात अझीम काझीने आपली विकेट गमावली. त्याला युवराजसिंग दोडियाने पायचीत केले. दुसऱ्या दिवसाआखेर महाराष्ट्र संघाच्या दुसऱ्या डावात २७ षटकात ५ गडी बाद १०४ अशी धावसंख्या झाली आहे.  सौराष्ट्र संघाकडून पार्थ भुट याने २ बळी, युवराजसिंग दोडीया २ बळी तर जयदेव उनाडकट यांना एक बळी घेण्यात यश मिळवता आले. अजूनही महाराष्ट्र संघाला विजयासाठी १०४ धावांची गरज आहे .