शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अंतिम आदेश का काढले नाहीत उच्च न्यायालयाकडून शासनास विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST

यासंबंधी अकलूज येथे साखळी उपोषण चालू आहे. त्याचबरोबर अकलूज,माळेवाडी, नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली ...

यासंबंधी अकलूज येथे साखळी उपोषण चालू आहे. त्याचबरोबर अकलूज,माळेवाडी, नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. त्याची गुरुवारी ८ जुलै रोजी सुनावणी झाली. याचिकेमध्ये अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायत व नातेपुते ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने अ‍ॅड. अभिजित कुलकर्णी व शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ए. आय. पटेल हे युक्तिवाद करीत आहेत.

अकलूज व माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्यासाठी अकलूज-माळेवाडी व नातेपुते या तीनही गावच्या नागरिकांनी सन २०१८ पासून प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया सप्टेंबर २०१९ मध्ये अंतिम टप्प्यात असल्याचे शासनानेच लेखी स्वरूपात कबूल केले आहे. तरीदेखील ५० हजारांपेक्षा जास्त लोकांच्या महत्त्वाच्या नागरी हक्कांबाबतचा निर्णय घेण्यास शासन यंत्रणेची उदासीनता लक्षात घेऊन तिन्ही गावांच्या वतीने अ‍ॅड. अभिजित कुलकर्णी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

----

नागरी हक्कापासून का वंचित ठेवले?

अकलूज व माळेवाडीतील ५० हजारांपेक्षा जास्त लोकांच्या महत्त्वाच्या अशा नागरी हक्कांबाबतचा ठोस निर्णय महाराष्ट्र शासनाने का घेतला नाही? त्यांच्या नागरी हक्कांपासून वंचित का ठेवण्यात आले? आज शासनाच्या संबंधित खात्यामार्फत या प्रश्नांना सांगण्यासारखी कोणतीही माहिती सरकारी वकिलांच्या कार्यालयात देण्यात आलेली नाही, असे सरकारी वकिलांकडून सांगण्यात आले. सरकारी वकिलांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित खात्याकडून माहिती घेऊन उच्च न्यायालयास ७ दिवसांत उत्तर जाब देण्यास सांगितले आहे. आता सुनावणीची पुढील तारीख १७ जुलै निश्चित करण्यात आली आहे. अशाप्रकरे, उच्च न्यायालयात शासनाला जाब विचारला गेल्यामुळे, अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत निर्मिती दृष्टिपथात आली आहे.

----