शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

तुकोबारायांचे जिल्ह्यात आगमन

By admin | Updated: July 5, 2014 00:29 IST

रिंगण सोहळा रंगला; अकलूजच्या मुक्कामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अकलूज : टाळ मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयजयकारात देहूच्या वाड्यावरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आज आगमन झाले असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात केले. सोहळ्याचे अकलूज येथे गोल रिंगण होऊन पालखी सोहळा अकलूज मुक्कामी विसावला.देहू ते पंढरपूर असा प्रवास मजल-दरमजल करीत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराटी येथील मुक्काम आटोपून आज सोलापूर-पुणे जिल्ह्याची सरहद्द नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्यात प्रवेश करताच तोफांच्या सलामीत जिल्हा सरहद्दीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा पोलीस प्रमुख मकरंद रानडे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, आ. हणमंत डोळस, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन.एन. मालदार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम झेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार विजय पाटील, जि.प. सदस्य मोहनराव लोंढे यांनी पालखी व अश्वाचे पुष्पहार घालून स्वागत केले. तत्पूर्वी पालखी सोहळ्याने सराटीकरांचा निरोप घेण्यापूर्वी नीरा नदीच्या पात्रातील पाण्यात पालखीच्या अश्वांना व पादुकांना स्रान घालण्यात आले.जिल्ह्यात पालखी सोहळ्याने प्रवेश करून अकलूज (ता. माळशिरस) शहरात प्रवेश करताना गांधी चौकात खा. विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, माजी जि.प. अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, पं.स. सदस्य पांडुरंग देशमुख, पांडुरंगराव देशमुख, फातिमा पाटावाला, सरपंच शशिकला भरते व ग्रामपंचायत सदस्यांनी सोहळ्याचे स्वागत केले.सदाशिवराव माने विद्यालयातील रिंगण सोहळ्यात अश्व धावण्यापूर्वी झेंडेधारी वारकरी, तुळशी डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाज वादक यांनी रिंगण सोहळ्यास प्रदक्षिणा मारल्यानंतर यंदा प्रथमच पालकमंत्री दिलीप सोपल, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, आ. हणमंत डोळस, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम झेंडे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी हे रिंगण सोहळ्यात धावले. ---------------------------------गैरसमजामुळे घडले...अश्व बाहेर काढण्याच्या घटनेवर प्रतापसिंह मोहिते - पाटील म्हणाले, माझा अश्व जाणीवपूर्वक राजकीय आकसापोटी बाहेर काढला तर जयसिंह मोहिते - पाटील म्हणाले, तो अश्व पूजा केल्यानंतर घोडेस्वार स्वत:च बाहेर घेऊन गेले. पालखी सोहळा प्रमुखांनी तर प्रतापसिंहांचा अश्व बाहेर जाणे हा प्रकार गैरसमजावरून झालेला आहे.----------------------------‘त्या’ अश्वाने रिंगण केलेच नाहीअकलूजमध्ये आज श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ््यातील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या गोल रिंगणात ३0 वर्षे धावणारा प्रतापसिंह मोहिते—पाटील यांचा अश्व रिंगण न करताच निघून गेला. पालखी सोहळ््यातील ही घटना चर्चेचा विषय ठरली.