शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महिमच्या सरपंचपदी अर्चना नारनवर, उपसरपंचपदी आशाबाई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:29 IST

महिम ग्रामपंचायतीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १५ पैकी ११ जागा शेकापला मिळाल्या तर शिवसेना-राष्ट्रवादीला अवघ्या चार जागेवर समाधान मानावे लागले ...

महिम ग्रामपंचायतीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १५ पैकी ११ जागा शेकापला मिळाल्या तर शिवसेना-राष्ट्रवादीला अवघ्या चार जागेवर समाधान मानावे लागले होते. २६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. के. तोटावाड यांच्या अधिपत्याखाली सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी शेकापकडून सरपंचपदासाठी वसंत ईश्वरा रुपनर, अर्चना सुरेश नारनवर व आबासो कारंडे असे तीन अर्ज तर उपसरपंच पदासाठी शेकापकडून शंकर लक्ष्मण चौगुले व शिवसेनेकडून आशाबाई बिभीषण पाटील असे दोन अर्ज प्राप्त झाले होते. ऐनवेळी वसंत रुपनर यांनी अर्ज माघारी घेतला. त्यानंतर शेकापचे सदस्य शंकर चौगुले यांनी गुप्त मतदान घेण्याची मागणी केली. यावेळी गुप्त मतदानप्रक्रियेत शेकापच्या उमेदवार अर्चना सुरेश नारनवर यांना ८ तर शेकापचेच दुसरे उमेदवार आबासो कारंडे यांना ७ मते मिळाली. उपसरपंचपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार आशाबाई पाटील यांना ८ तर शेकापचे शंकर चौगुले यांना ७ मते मिळाली. ऐनवेळी शेकापचे एक मत फुटल्याने उपसरपंचपदाचे उमेदवार शंकर चौगुले यांचा पराभव झाला. निवडणूक प्रक्रियेसाठी ग्रामसेवक बाबासाहेब खटकाळे यांनी सहकार्य केले. यावेळी शेकाप, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

फोटो ::::::::::::

सरपंच अर्चना नारनवर

उपसरपंच आशाबाई पाटील