शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

एप्रिल उजाडला तरी एकाही गावचा टंचाईचा प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:22 IST

प्रतिवर्षी जानेवारी महिन्यापासून ग्रामीण जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. यामुळे प्रत्येकवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत ...

प्रतिवर्षी जानेवारी महिन्यापासून ग्रामीण जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. यामुळे प्रत्येकवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत असत. यंदा एप्रिल महिना उजाडला तरी तालुक्यातील १३१ गावांपैकी अध्याप एकाही गावात पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. याचे कारणही तितकेच सत्य आहे. गतवर्षी पावसाळ्यात मुबलक पाऊस झाला. यामुळे सर्वत्र नदी, नाले तुडुंब भरून वाहिले. बोरी, हरणा, भीमा, सीना या नद्यांना महापूर येऊन गेला. परिणामी विहीर, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे कुठेही पाणीटंचाई भासताना दिसत नाही.

तरीही शासनाने पूर्वतयारी म्हणून तालुक्यातील संभाव्य ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा करणे यांचा समावेश आहे.

संभाव्य पाणीटंचाई असणारी गावे

आंदेवाडी बु., बबलाद, परमानंदनगर, भोसगे व तांडा, बिंजगेर, बोरगाव, बोरोटी बु., बोरोटी खु., चिंचोळी मैं., चिंचोळी न., दहिटणे, दहिटणेवाडी, दोड्याळ, गौडगाव बु., हालहळळी (अ.), हंजगी, हसापूर, हत्तीकणबस, इब्राहिमपूर, जकापूर, जेऊर, कलहिप्परगे, कर्जाळ, केगाव बु., केगाव खु., मंगरूळ, मिरजगी, मुगळी, नागनहळ्ळी, नागणसूर, नागोरे, नाविदगी, रामपूर/इटगे, सलगर, समर्थनगर-अंबावाडी, संगोगी (आ.), संगोगी (ब.), शावळ, शिरवळ, शिरवळवाडी, सिन्नूर, दुधनी ग्रा., सुलेरजवळगे, तळेवाड, तोळनूर, वसंतराव नाईकनगर, वागदरी या ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपये खर्चाची तरतूद केली आहे. या निधीमधून विहीर अधिग्रहण व टँकरने पाणीपुरवठा करणे अशी कामे करण्यात येतील.

कोट :::::::::::

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचे प्रस्ताव येत होते. यंदा एकाही गावचा प्रस्ताव आलेला नाही, तरीही प्रशासनाने संभाव्य म्हणून मागील इतिहासाचे अवलोकन करून टंचाई आराखडा तयार करून ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपयांची तरतूद केली आहे.

- शिवाजी चव्हाण,

उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग