शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

एप्रिल उजाडला तरी एकाही गावचा टंचाईचा प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:22 IST

प्रतिवर्षी जानेवारी महिन्यापासून ग्रामीण जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. यामुळे प्रत्येकवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत ...

प्रतिवर्षी जानेवारी महिन्यापासून ग्रामीण जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. यामुळे प्रत्येकवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत असत. यंदा एप्रिल महिना उजाडला तरी तालुक्यातील १३१ गावांपैकी अध्याप एकाही गावात पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. याचे कारणही तितकेच सत्य आहे. गतवर्षी पावसाळ्यात मुबलक पाऊस झाला. यामुळे सर्वत्र नदी, नाले तुडुंब भरून वाहिले. बोरी, हरणा, भीमा, सीना या नद्यांना महापूर येऊन गेला. परिणामी विहीर, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे कुठेही पाणीटंचाई भासताना दिसत नाही.

तरीही शासनाने पूर्वतयारी म्हणून तालुक्यातील संभाव्य ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा करणे यांचा समावेश आहे.

संभाव्य पाणीटंचाई असणारी गावे

आंदेवाडी बु., बबलाद, परमानंदनगर, भोसगे व तांडा, बिंजगेर, बोरगाव, बोरोटी बु., बोरोटी खु., चिंचोळी मैं., चिंचोळी न., दहिटणे, दहिटणेवाडी, दोड्याळ, गौडगाव बु., हालहळळी (अ.), हंजगी, हसापूर, हत्तीकणबस, इब्राहिमपूर, जकापूर, जेऊर, कलहिप्परगे, कर्जाळ, केगाव बु., केगाव खु., मंगरूळ, मिरजगी, मुगळी, नागनहळ्ळी, नागणसूर, नागोरे, नाविदगी, रामपूर/इटगे, सलगर, समर्थनगर-अंबावाडी, संगोगी (आ.), संगोगी (ब.), शावळ, शिरवळ, शिरवळवाडी, सिन्नूर, दुधनी ग्रा., सुलेरजवळगे, तळेवाड, तोळनूर, वसंतराव नाईकनगर, वागदरी या ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपये खर्चाची तरतूद केली आहे. या निधीमधून विहीर अधिग्रहण व टँकरने पाणीपुरवठा करणे अशी कामे करण्यात येतील.

कोट :::::::::::

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचे प्रस्ताव येत होते. यंदा एकाही गावचा प्रस्ताव आलेला नाही, तरीही प्रशासनाने संभाव्य म्हणून मागील इतिहासाचे अवलोकन करून टंचाई आराखडा तयार करून ४७ गावांसाठी ३६ लाख, ७२ हजार रुपयांची तरतूद केली आहे.

- शिवाजी चव्हाण,

उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग