शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पशुखाद्य दरवाढ अन् दुधाचे दर ढासळलं; शेती व्यवसायाचे अर्थकारण कोलमडलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:21 IST

ग्रामीण बेरोजगारीवर कमी गुंतवणुकीत उपजीविकेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो; मात्र या व्यवसायाला ...

ग्रामीण बेरोजगारीवर कमी गुंतवणुकीत उपजीविकेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो; मात्र या व्यवसायाला मोठी घरघर लागल्याचे दिसत आहे. जनावरांचा चारा व पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडत असतानाच दूध दराची घसरण कायम होताना दिसत आहे. या व्यवसायातील ही स्थिती बळीराजाला दिवसेंदिवस नुकसानीचा सामना करणारी ठरत आहे. याकडे प्रशासकीय स्तरावर सकारात्मक दृष्टीने निर्णय घेणे आवश्यक आहे; अन्यथा या शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून बळीराजाचा बळी जाणार आहे.

दूध उत्पादकांसाठी दुष्काळात तेरावा

तालुक्यात दूध उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुधाच्या इतर उत्पादनामुळे या व्यवसायातील संधी समजून मोठी गुंतवणूक करीत व्यवसायाला सुरुवात केली आहे; मात्र चारा व पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे खर्च वाढला आहे. दुधाचे दर ढासळत असल्यामुळे नुकसान होताना दिसत आहे. खरेदी व विक्री यातील तफावत मोठी असून, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे दूध उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान होत असतानाच शेतीपूरक व्यवसायाची झालेली हालत म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती सध्या बळीराजाची झाली असल्याचे खडूस येथील शेतकरी भीमराव ठवरे यांनी सांगितले.