शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सोलापूर जिल्ह्यात कृषीपंपाची तब्बल ४२४ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 15:25 IST

सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० थकबाकीदार ग्राहकांपैकी ६४ हजार ५३१ कृषिपंप ग्राहकांनी नवीन वीजजोडणी घेतल्यापासून एकही बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे ४२४ कोटी २८ लाख रुपये थकबाकी आहे

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० थकबाकीदारथकबाकीदार शेतकºयांना दिलासा देण्यासाठी 'मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना थकबाकी वाढत राहिली तर त्याचा वीजवितरण सेवेवर परिणाम होऊ शकतो

आप्पासाहेब पाटीलसोलापूर दि २ : सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० थकबाकीदार ग्राहकांपैकी ६४ हजार ५३१ कृषिपंप ग्राहकांनी नवीन वीजजोडणी घेतल्यापासून एकही बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे ४२४ कोटी २८ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकीदार शेतकºयांना दिलासा देण्यासाठी 'मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना - २०१७' जाहीर करण्यात आली आहे. याचा कृषिपंप लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.          अनेकदा आवाहन करूनही कृषिपंप वीजग्राहक वीजबिल भरत नसल्याने बारामती मंडलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० कृषिपंप ग्राहकांकडे २ हजार ३७० कोटी ५१ लाख रुपये थकबाकी आहे. आधीच महावितरण आर्थिक संकटात सापडली आहे. महावितरणची थकबाकी अशीच वाढत राहिली तर त्याचा वीजवितरण सेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महावितरणला नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घ्यावी लागते.          सोलापूर जिल्ह्यातील एकदाही वीजबिल न भरणाºया कृषिपंप ग्राहकांमध्ये माळशिरस तालुक्यातील ५ हजार ८५० ग्राहकांकडे ३६ कोटी ४८ लाख, बार्शी तालुक्यातील ७ हजार ३४८ ग्राहकांकडे ५० कोटी २७ लाख, करमाळा तालुक्यातील ७ हजार ५०७ ग्राहकांकडे ६५ कोटी ९ लाख, माढा तालुक्यातील ११ हजार ४६७ ग्राहकांकडे ८६ कोटी १९ लाख, मंगळवेढा तालुक्यातील ४ हजार २२८ ग्राहकांकडे १६ कोटी ९४ लाख, पंढरपूर तालुक्यातील ६ हजार ६१४ ग्राहकांकडे ४१ कोटी ९८ लाख, सांगोला तालुक्यातील ४ हजार ६८५ ग्राहकांकडे २२ कोटी ४७ लाख, अक्कलकोट तालुक्यातील ३ हजार ८१२ ग्राहकांकडे २५ कोटी ५४ लाख, मोहोळ तालुक्यातील ६ हजार ७०१ ग्राहकांकडे ४६ कोटी १२ लाख, उत्तर सोलापूर तालुक्यातील १ हजार ९७५ ग्राहकांकडे ९ कोटी ७२ लाख तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ४ हजार ३४४ ग्राहकांकडे २३ कोटी ४८ लाख रुपये थकबाकी आहे. --------------------------------     तीन वर्षांत ७ हजारांहून अधिक जोडण्या   मागील तीन वर्षांचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यात महावितरणच्या वतीने कृषिपंपांना विक्रमी वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये २०१५-१६ या आर्थिक वर्षात ५ हजार ८९४ नवीन कृषिपंप जोडण्या देण्यात आल्या. २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ हजार ४९ तर २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ७७५ कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.