शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विकासकामांच्या मुहूर्ताला आचारसंहितेची ॲलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST

माळशिरस : यंदाच्या आर्थिक वर्षात जागतिक महामारीचा सामना करताना विकासकामांवर परिणाम जाणवत आहे. यातच लॉकडाऊन, प्रतिबंधात्मक योजना व ...

माळशिरस : यंदाच्या आर्थिक वर्षात जागतिक महामारीचा सामना करताना विकासकामांवर परिणाम जाणवत आहे. यातच लॉकडाऊन, प्रतिबंधात्मक योजना व आचारसंहिता विकासकामात आडकाठी ठरत आहे. नुकतेच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. यामुळे तालुक्यातील विविध योजनेच्या विकासकामांना खीळ बसली आहे. यातील कोट्यवधी रुपयांचा निधी वर्षाअखेर मार्गी न लागल्यास परत शासनाकडे जाणार आहे.

यावर्षीच्या आर्थिक वर्षात कोरोना महामारीनंतर पदवीधर मतदारसंघ निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका व सध्या विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता यामुळे वर्षभरात विकासकामांना मुहूर्त साधता आला नाही. सध्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत विकासकामांच्या मंजुऱ्या अंतिम टप्प्यात आल्या होत्या. याशिवाय वर्षाखेर जवळ आल्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या हालचालींना वेग आला होता. असे असतानाच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाली. यामुळे जिल्ह्यात पुन्हा सुरू होणाऱ्या विकासकामांना खीळ बसली आहे.

या विकासकामांना बसली झळ

१४, १५वा वित्त आयोग, जनसुविधा, दलितवस्ती, आमदार, खासदार फंड, २५/१५ योजनेअंतर्गत पाणीपुरवठा, मनरेगा, केंद्र व राज्य सरकारच्या योजना अशा वेगवेगळ्या योजनेतील कामांना मंजुरी घेता येत नाही. त्यामुळे साहजिकच यातील काही कामांचा विकास निधी नियोजित कामासाठी वापरणे अडचणीचेेे ठरणार आहे. काही योजनांमधील निधी पुढील वर्षात वापरता येणार नाही.

कोट :::::::::::::::::::

वर्षभरातील विविध अडचणींमुळे वर्षाअखेर वेगवेगळ्या योजनेतील विकासकामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता जाहीर झाली आहे, तर वर्षाअखेर असल्याने अनेक विकासकामांना अडथळा येत आहे. त्यामुळे फक्त निवडणुकीच्या ठिकाणी आचारसंहिता असावी, इतर ठिकाणी शिथिलता झाली तर विकासकामे मार्गी लागतील. त्यामुळे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे.

- अर्जुनसिंह मोहिते-पाटील

उपसभापती, पंचायत समिती