शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांपासून अक्कलकोटचा पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:21 IST

नगरपालिकेकडून पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रकार जुना आहे. मात्र सध्या ऐन सणासुदीच्या काळात हा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप ...

नगरपालिकेकडून पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रकार जुना आहे. मात्र सध्या ऐन सणासुदीच्या काळात हा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे कुरनूर, सांगवी, हिळळी, हालचिंचोळी अशा एकूण चार योजना आहे. त्यापैकी केवळ कुरनूर योजनेतून पाणी उपसा सुरू आहे. सांगवी योजना जुजबी सुरू आहे. उर्वरित बंद आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून शहरातील ५ हजार २०० ग्राहकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम नगरपालिकाकडून होत आहे. यामुळे शहरातील ५० हजार लोकांचे ओरड सुरू आहे. याबाबत म्हाडा कॉलनी, उत्कर्ष नगर खासबाग, एवन चौक, आझाद गल्ली, सुभाष गल्ली, फत्तेसिंह चौक, माळी गल्ली आदी भागातून नागरिकांनी नगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. सध्या रमजान, बसव जयंती अक्षय तृतीया अशा सणासुदीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शहरवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. सध्या दहा दिवसांपासून बंद आहे. धरणात पाणीसाठा मुबलक असतानाही केवळ नियोजनअभावी विस्कळीत होत आहे. एकंदरीत धरण उशाला, कोरडा घशाला अशी स्थिती निर्माण झाली आहे.

----

अनेक वर्षांपासून कुरनूर योजनेतून पाणी उपसा करण्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र डीपी, लाईन ओढून घ्यावी, असे पत्र एमएसईबीकडून दिले आहे. यावर आजवर नगरपालिकाकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही. म्हणून वादळी वाऱ्याने वारंवार वीज खंडित होऊन पाणी उपसा व पुरवठा विस्कळीत होत आहे. यावर आजवर नगरपालिकेने गांभीर्याने विचार केलेले नाही, असा आरोप शहरवासीयांमधून होत आहे.

---

वादळी वाऱ्याने कुरनूर येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पाणी उपसा विस्कळीत झाला आहे. त्यासाठी नवीन लाईन ओढण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर आहे. त्याची नगरपालिकेडून कार्यवाही पूर्ण झाली आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सतत सुरळीत राहण्यास मदत होईल.

- एम. डी. शेख, पाणीपुरवठा अभियंता,नगरपालिका

----

म्हाडा काॅलनीत तब्बल ११ दिवसांनंतरही पाणीपुरवठा नाही. त्यामुळे येथील नागरिकांमधून नगरपरिषदेच्या प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुबलक पाणी असून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे. प्रशासनाधिकाऱ्यांना विचारले असता लाईट नाही, पाणी टँकर नाही, तुमचे तुम्ही बघून घ्या अशी उडवाउडवीची उत्तरे देतात.

- मलकप्पा भरमशेट्टी, अध्यक्ष, म्हाडा काॅलनी

----