शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

दहा दिवसांपासून अक्कलकोटचा पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:21 IST

नगरपालिकेकडून पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रकार जुना आहे. मात्र सध्या ऐन सणासुदीच्या काळात हा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप ...

नगरपालिकेकडून पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रकार जुना आहे. मात्र सध्या ऐन सणासुदीच्या काळात हा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे कुरनूर, सांगवी, हिळळी, हालचिंचोळी अशा एकूण चार योजना आहे. त्यापैकी केवळ कुरनूर योजनेतून पाणी उपसा सुरू आहे. सांगवी योजना जुजबी सुरू आहे. उर्वरित बंद आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून शहरातील ५ हजार २०० ग्राहकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम नगरपालिकाकडून होत आहे. यामुळे शहरातील ५० हजार लोकांचे ओरड सुरू आहे. याबाबत म्हाडा कॉलनी, उत्कर्ष नगर खासबाग, एवन चौक, आझाद गल्ली, सुभाष गल्ली, फत्तेसिंह चौक, माळी गल्ली आदी भागातून नागरिकांनी नगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. सध्या रमजान, बसव जयंती अक्षय तृतीया अशा सणासुदीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शहरवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. सध्या दहा दिवसांपासून बंद आहे. धरणात पाणीसाठा मुबलक असतानाही केवळ नियोजनअभावी विस्कळीत होत आहे. एकंदरीत धरण उशाला, कोरडा घशाला अशी स्थिती निर्माण झाली आहे.

----

अनेक वर्षांपासून कुरनूर योजनेतून पाणी उपसा करण्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र डीपी, लाईन ओढून घ्यावी, असे पत्र एमएसईबीकडून दिले आहे. यावर आजवर नगरपालिकाकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही. म्हणून वादळी वाऱ्याने वारंवार वीज खंडित होऊन पाणी उपसा व पुरवठा विस्कळीत होत आहे. यावर आजवर नगरपालिकेने गांभीर्याने विचार केलेले नाही, असा आरोप शहरवासीयांमधून होत आहे.

---

वादळी वाऱ्याने कुरनूर येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पाणी उपसा विस्कळीत झाला आहे. त्यासाठी नवीन लाईन ओढण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर आहे. त्याची नगरपालिकेडून कार्यवाही पूर्ण झाली आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सतत सुरळीत राहण्यास मदत होईल.

- एम. डी. शेख, पाणीपुरवठा अभियंता,नगरपालिका

----

म्हाडा काॅलनीत तब्बल ११ दिवसांनंतरही पाणीपुरवठा नाही. त्यामुळे येथील नागरिकांमधून नगरपरिषदेच्या प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुबलक पाणी असून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे. प्रशासनाधिकाऱ्यांना विचारले असता लाईट नाही, पाणी टँकर नाही, तुमचे तुम्ही बघून घ्या अशी उडवाउडवीची उत्तरे देतात.

- मलकप्पा भरमशेट्टी, अध्यक्ष, म्हाडा काॅलनी

----