शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

अक्कलकोट बसस्थानक जीर्ण, बीओटी तत्त्वावर दिल्यास रूप पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST

अक्कलकोट बसस्थानकाची इमारत अत्यंत जुनी आहे. पूर्णपणे जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात बसस्थानक पूर्णपणे गळते. स्थानकातील खांब तुटले आहेत. त्यामुळे ...

अक्कलकोट बसस्थानकाची इमारत अत्यंत जुनी आहे. पूर्णपणे जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात बसस्थानक पूर्णपणे गळते. स्थानकातील खांब तुटले आहेत. त्यामुळे बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. याची दखल घेत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरामधून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे बसस्थानकावर सतत गर्दी असते. सध्याचे बसस्थानक जुने असून, त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. यामुळे भक्तांची व स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना युती शासनाकडून सदर बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर झालेले आहे. परंतु निधीअभावी सदरचे काम सुरू होण्यास विलंब होत आहे.

.............

अक्कलकोट हे महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी बसस्थानकाचे रूप बदलणे गरजेचे आहे. म्हणून बीओटी तत्त्वावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी मंजुरी द्यावी. त्यातून बसस्थानकाचे चित्र बदलेल.

- आमदार सचिन कल्याणशेट्टी

......

फोटो ओळी

अक्कलकोट बसस्थानकाचे रूप पालटण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी.

............

(फोटो ०६अक्कलकोट एसटी)