शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विजेसाठी अकलूज महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:21 IST

माळशिरस तालुक्याच्या सर्वच भागातील शेतकऱ्यांनी ज्येष्ठ भाजपा नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन विजेची समस्या सांगितली होती. यावेळी विजयसिंह ...

माळशिरस तालुक्याच्या सर्वच भागातील शेतकऱ्यांनी ज्येष्ठ भाजपा नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन विजेची समस्या सांगितली होती. यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज महावितरण व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन वीजपुरवठा सुरळीत करण्याविषयी चर्चा केली होती. थकीत असलेल्या रकमेपैकी थोडी रक्कम भरली तर वीजपुरवठा सुरळीत करु, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयाच्या दारात बैठक मारत आश्वासन देऊनही वीजपुरवठा सुरळीत का केला जात नाही, याबाबत जाब विचारला.

ठरल्याप्रमाणे आम्ही रक्कम भरावयास तयार आहोत, तरीही तुम्ही वीजपुरवठा का करत नाही, असे विचारल्यावर अधिकारी निरुत्तर झाले. बैठकीत जी रक्कम ठरली होती ती अत्यंत तोकडी असून वाढीव रक्कम भरावी लागेल ,असे म्हटल्यावर शेतकरी हैराण झाले. यावर शेतकरी प्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबरोबर पुन्हा चर्चा करण्यात आली आणि रक्कम थोडी वाढवून भरण्याचा तोडगा सामोपचाराने काढण्यात आला. सदरची रक्कम येत्या सोमवारपर्यंत भरावयाचे व उरलेली रक्कम ३० मार्चपर्यंत भरावयाचे असे ठरल्यावर शेतकरी कार्यालयातून बाहेर पडले.

यावेळी सहकारमहर्षी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, किशोरसिंह माने-पाटील, रावसाहेब पराडे, दत्तात्रय चव्हाण, तात्या आसबे, विकास कोळेकर, धनाजी चव्हाण, सतीश शेंडगे, उत्तम भोसले, किसन चव्हाण, लक्ष्मण पारसे, शंकर शेंडगे, संजय मिसाळ, अशोक चव्हाण, अनिल मुंडफने, विठ्ठल ताटे-देशमुख, विठ्ठल नलवडे, बाबासाहेब ताटे-देशमुख, विनायक पराडे, महेंद्र खिलारे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणि तात्यांनी काढली कपडे

८५ वर्षे वय असणारे लक्ष्मणतात्या आसबे हे शेतकरी मोर्चात सामील होते. त्यांनी विजेअभावी होणारे शेतकऱ्यांचे हाल अधिकाऱ्यांसमोर मांडताना वैतागून आपल्या अंगावरचा शर्टच काढून टाकला. वीजपुरवठा सुरळीत करत नाही, तोपर्यंत पाणी पिणार नाही व शर्टही घालणार नाही आणि येथून उठणारही नाही, असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. अधिकाऱ्यांकडून आश्वासन घेतल्यावरचा त्यांनी अंगावर शर्ट चढवला.

७५३ कोटी रुपयांची थकबाकी

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांकडे कृषिपंपाची सुमारे ७५३ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यात अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना थकबाकी भरण्यासाठी महावितरणने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यांनी याचा लाभ घ्यावा व थकबाकी जमा करावी. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यास सहाय होईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.