शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

वीजबिल वसुल न केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई !

By admin | Updated: March 18, 2017 18:09 IST

वीजबिल वसुल न केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई !

वीजबिल वसुल न केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई !प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांचे आवाहनसोलापूर : ग्राहकांना अचूक व वेळेवर वीजबिले देण्यासह थकबाकी वसुलीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. थकबाकी वसुली ही महावितरणची आर्थिक गरज आहे. त्यामुळे वसुलीमध्ये हयगय झाल्यास संबंधितांविरुद्घ कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिला.येथील बिजली भवनमध्ये आयोजित सोलापूर मंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर उपस्थित होते. प्रादेशिक संचालक ताकसांडे यांनी वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी स्वत: पुढाकार घेऊन अधिकारी काम करत आहेत. मात्र काही ठिकाणी वारंवार सूचना देऊनही जे अधिकारी काम करीत नाहीत, त्यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.वीजबिलांच्या थकबाकीची शंभर टक्के वसुली, ग्राहकांना अचूक बिल, वीजगळती कमी करणे व सुरळीत वीजपुरवठा करणे हे आपले मूलभूत उद्दिष्ट आहे. ते सर्वांनी पूर्ण करायचे आहे. साडेसात अश्वशक्ती व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या कृषिपंपांना वीजमीटर अनिवार्य करण्यात आले आहे. या सर्व कृषीपंपांना या महिन्याअखेर वीजमीटर बसविण्यात यावेत. ग्राहकांचे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याच्या कामास गती देऊन मार्चअखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही ताकसांडे यांनी दिले. यावेळी सोलापूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, अरुण थोरात, कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार, सुनील यादव, संदीप सानप, सुरेश कोळी, अमसिद्घ हुवाळे, मधुसूदन बरकडे, प्रणाली विश्लेषक मकरंद बोराळकर यांच्यासह सोलापूर मंडलातील अभियंते, अधिकारी उपस्थित होते.