शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

नोव्हेंबरपर्यंतची ‘एफआरपी’ न दिल्यास कारवाइ

By admin | Updated: January 23, 2015 23:43 IST

साखर आयुक्तांचा निर्णय : राजू शेट्टी यांची माहिती; २६ जानेवारीचे पालकमंत्री घेराओ आंदोलन स्थगिर्त

कोल्हापूर : राज्यातील जे सहकारी व खासगी साखर कारखाने नोव्हेंबर अखेरपर्यंत गाळप झालेल्या उसास एफआरपी देणार नाहीत, त्यांची ३१ जानेवारीनंतर साखर गोदामे जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी आज, शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.त्यामुळे २६ जानेवारीला पालकमंत्र्यांना घेराओ घालण्याचे आंदोलन तूर्त स्थगित केले आहे, परंतु; ज्या त्या पालकमंत्र्यांना संघटनेचे कार्यकर्ते त्यादिवशी निवेदन देऊन एफआरपी देण्याची मागणी करणार आहेत, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘आम्ही कारखानदारांना २६ जानेवारीची अखेरची मुदत दिली होती. परंतु आंदोलनाचा धसका घेऊन साखर आयुक्तांनी जिल्हानिहाय बैठका सुरू केल्या आहेत. कालच सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक त्यांनी घेतली आहे. त्यामध्ये नोव्हेंबरअखेर गाळप झालेल्या उसाचे बिल एफआरपीनुसार देण्यात येईल, असे संचालक मंडळांकडून लेखी घेण्यात येत आहे. जे कारखाने एफआरपीनुसार बिले देणार नाहीत, त्यांची साखर गोदामे महसुली थकबाकीची वसुली कायद्यान्वये ३१ जानेवारीनंतर सील करण्याची कारवाई साखर आयुक्त सुरू करतील, तसे त्यांनी स्पष्टच शब्दांत कारखानदारांना सांगितले आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना एफआरपीनुसार बिले मिळू शकतील.साखर जप्त करून हा प्रश्न सुटणार आहे का, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर शेट्टी म्हणाले, ‘एकदा कारवाईच्या नोटिसा लागू झाल्यावर कारखानदार पोपटासारखे बोलू लागतील.’ऊसदराच्या प्रश्नांवर माझी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशीही चर्चा झाली आहे. साखर आयुक्तांनी दिलेल्या डेडलाईननुसार जे कारखाने एफआरपी देणार नाहीत, त्यांच्याविरोधात संघटना फेब्रुवारीत आक्रमक आंदोलन करेल. यंदा ऊस जास्त असल्याने त्याच्या गाळपाची भीती होती. आता निम्म्याहून जास्त गाळप झाले आहे. त्यामुळे आता हंगाम संपताना दरासाठी आक्रमक आंदोलन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)